AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ एका किसमुळे नशीब फिरलं… नाहीतर आज राणी मुखर्जी बच्चन कुटुंबातील सून असती; हा किस्सा माहित्ये का?

Rani Mukerji Birthday : करिश्मा कपूरसोबत झालेला साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. राणी बच्चनन कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अचानक या बातम्यांना ब्रेक लागला आणि अभिषेकने राणी मुखर्जीऐवजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.

'त्या' एका किसमुळे नशीब फिरलं... नाहीतर आज राणी मुखर्जी बच्चन कुटुंबातील सून असती; हा किस्सा माहित्ये का?
| Updated on: Mar 21, 2023 | 3:53 PM
Share

नवी दिल्ली : निखळ हास्य आणि दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अभिराज्य करणाऱ्या राणी मुखर्जीचा (Rani Mukharjee)  आज वाढदिवस असतो. राणीने चित्रपटसृष्टीवर एकेकाळी खरंच राज्य केले होते. अनेक हिट्स देऊन मनोरंजन सृष्टीत आघाडीवर होती. त्याचवेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा सुरू होत्या. उत्तम अभिनेत्री असलेली राणी आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचे काही चित्रपटही (movies) एकत्र प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये दोघांची जोडी लोकांच्या खूप पसंतीस उतरली होती. त्यावेळी या दोघांच्या प्रेमाच्या चर्चाही बॉलिवूडमध्ये (bollywood)रंगल्या होत्या.

करिश्मा कपूरसोबत झालेला साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. राणी बच्चनन कुटुंबाची सून होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अचानक या बातम्यांना ब्रेक लागला आणि अभिषेकने राणी मुखर्जीऐवजी ऐश्वर्या रायसोबत लग्न केले.

राणी मुखर्जीसोबतचे अभिषेक बच्चनचे नाते तुटण्याचे कारण त्याची आई जया बच्चन या मानल्या जातात. असल्याचे मानले जाते. राणीच्या एका किसिंग सीनमुळे जया बच्चन नाराज झाल्या होत्या.

अमिताभ बच्चन यांना केले होते किस

राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी ‘ब्लॅक’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट खूप गाजला होता. राणी व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. मात्र या चित्रपटात राणी मुखर्जीला शेवटी अमिताभ बच्चन यांना लिप किस करावे लागले होते. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा भावनांनी भरलेला एक उत्कट चित्रपट होता, ज्यामध्ये राणी व अमिताभ यांनी अक्षरश: झोकून देऊन काम केले होते. त्यांच्या या भूमिका खूप अप्रतिम झाल्या, खूप नावजल्याही गेल्या. त्या दोघांचा उत्तम अभिनय आणि चित्रपटाची उत्तम कथा आणि दिग्दर्शन यामुळे चित्रपट अप्रतिम झाला. संपूर्ण चित्रपटात सर्व काही ठीक होते, पण जया बच्चन यांना चित्रपटातील लिप किसिंग सीनवर आक्षेप होता. आपल्या भावी सुनेने सासऱ्याचे चुंबन घ्यावे हे जया बच्चन यांना पटले नव्हते. मात्र राणी मुखर्जी या सीनसाठी तयार झाली. चित्रपट तर पूर्ण झाला, खूप नावजलाही गेली. पण याचा फटका राणीला अभिषेक बच्चनसोबतच्या ब्रेकअपच्या रूपाने सहन करावा लागला.

राणीने व्यक्त केली होती नाराजी

या एका सीनमुळे जया बच्चन यांची नाराजी इतकी वाढली होती की, राणी मुखर्जीला अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या लग्नातही बोलावण्यात आले नव्हते. असे म्हटले जाते की यानंतर राणी मुखर्जीने तिची नाराजी व्यक्त केली आणि असेही म्हटले की ती अभिषेक बच्चनला चांगला मित्र मानत होती परंतु तो केवळ एक को-स्टारच राहिला. अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केले.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...