AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण…

Salman Khan - Aamir Khan: 'आमिरचे हात - पाय बांधून...', आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य, भाईजान असताना आमिर कधीच करु शकत नाही तिसरं लग्न, कारण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान - आमिर यांची चर्चा...

सलमान खान असताना आमिर कधीच नाही करु शकत तिसरं लग्न? कारण...
| Updated on: Aug 28, 2024 | 2:49 PM
Share

अभिनेता आमिर खान त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. पण अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अभिनेता लवकरच ‘सितारे जमीन पर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या आमिर त्याच्या आगामी सिनेमामुळे तर चर्चेत आहेच, पण नुकताच झालेल्या एका पॉटकास्ट शोमध्ये अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. आमिर खान याने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या ‘चॅप्टर 2’ या पॉडकास्टमध्ये स्वतःच्या तिसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं. पण अभिनेता सलमान खान असताना आमिर खान याचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही.

‘मी असताना आमिर खानचं तिसरं लग्न कधीच होऊ शकत नाही…’ असं खुद्द सलमान खान एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता. सांगायचं झालं तर, सलमान खान आणि आमिर खान चांगले मित्र आहेत. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

2017 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत आमिर खान याने सलमानच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सलमान खान याचे हात – पाय बांधून त्याला सप्तपदी घ्यायला लावेल…’ असं वक्तव्य आमिर खान याने केलं होतं. तर आमिर खानच्या या वक्तव्यावर सलमान खानने देखील प्रतिक्रिया दिली होती.

रिपोर्टनुसार, सलमान खान 2017 मध्ये म्हणाला होता की, ‘हो मी एका ठिकाणी वाचलं होतं, मी लग्न करावं अशी आमिरची इच्छा आहे. त्यासाठी तो माझे हात-पाय बांधेल. पण मी फक्त एवढंच सांगेल की, मी त्याचे हात – पाय बांधेल म्हणजे आमिर तिसरं लग्न करणार नाही…’ असं सलमान खान म्हणाला होता.

तिसऱ्या लग्नाबद्दल आमिर खानचं वक्तव्य

रिया हिने आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, ‘आता मी 59 वर्षांचा आहे… मला नाही वाटत की मी आता तिसरं लग्न करेल. मला कठीण वाटत आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या जवळ आलो आहे… मला माझी भावंड, मुलं आहेत. त्यांच्यासोबत मी फार आनंदी आहे… एक उत्तम व्यक्ती होण्याचा आता मी प्रयत्न करत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्याने 2005 मध्ये किरण राव सोबत लग्न केलं. पण अभिनेत्याचं दुसरं देखील टिकलं नाही. 2021 मध्ये आमिर – किरण यांनी घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोट झाला असला तरी अभिनेता दोन्ही कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Follow Us
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...