AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजही आमचं एकमेकांवर प्रेम’; आमिर खानच्या खुलासाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

आमिर खानने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या एका नात्यावर आणि प्रेमावर वक्तव्य केलं. 'आजही आमचं एकमेकांवर प्रेम आहे', असं म्हणत त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

'आजही आमचं एकमेकांवर प्रेम'; आमिर खानच्या खुलासाने सर्वांच्या भुवया उंचावल्या
| Updated on: Dec 18, 2024 | 5:08 PM
Share

आमिर खान हा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वक्तव्याने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. त्याचे दोन लग्न, अफेरच्या चर्चा यासर्वांमुळे नेहमीच त्याच्याविषयी चर्चा होत असतात तसेच कधीकधी त्याला ट्रोलही केलं जातं. पण आता आरिम खान पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्याने चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या प्रेमाबद्दल सांगताना म्हटलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आमिरने व्यक्त केलेलं हे प्रेम त्याची पत्नी किरणवरील होतं.

दरम्यान आमिर खानची दोन लग्न झाली आणि दोघींसोबत घटफोस्ट झाला. पण घटस्फोटानंतरही आमिरचे त्याच्या पत्नींसोबत चांगले आणि मैत्रिचे संबध आहे. अनेकदा या तिघांनापण एकत्र पाहिलेलं आहे.

आमिर खान आणिकिरण रावच्या घटस्फोटाच्या बातमीने मात्र सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र, घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण हे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. पर्सनल लाईफ असो किंवा प्रोफेशनल लाईफ, दोघेही नेहमीच एकमेकांसोबत असतात.

किरण राववरील त्याचं प्रेम व्यक्त

घटस्फोटानंतर त्यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता एका मुलाखतीदरम्यान आमिरने या चित्रपटाच्या यशाचे श्रेय किरण रावला दिले आहे. एवढच नाही तर त्याने किरण राववरील त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.

आमिर खानने नुकताच एका मुलाखतीमध्ये किरण आणि त्याच्या घटस्फोटावर आणि त्यांच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला की, “किरण माझ्या आयुष्यात आली आणि आम्ही सुंदर १६ वर्षे एकत्र घालावली. याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान मानतो आणि किरणचे आभार मानू इच्छितो. तिच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि आता एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहे.”

‘लापता लेडीज’ या चित्रपटासाठी आमिरने दिग्दर्शक म्हणून किरण रावची निवड का केली असा प्रश्न आमिरला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, म्हटलं की, ” कथानक मांडण्याची तिची शैली अतिशय सुंदर आणि खरी असते.

जेव्हा मी पटकथा वाचली तेव्हा माझ्या मनात पहिले नाव किरण होते कारण ती एक सच्ची दिग्दर्शक आहे आणि ही एक अतिशय उत्तम कथा मांडणारी दिग्दर्शिका. मला असा दिग्दर्शक हवा होता जो ही कथा सत्यासह सांगू शकेल’ असे उत्तर देत त्याने किरणचे कौतुक केले आहे.

“आजही आमच प्रेम…”

आमिरने या मुलाखतीमध्ये पुढे म्हटलं. ‘काही लपून राहिलेले नाही. ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि मी ही फार वाईट नाही, त्यामुळे आमचं नातं चांगलं गेलं. आम्ही आजही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमचं नातं थोडं बदललं आहे, पण याचा अर्थ असा नाही की आमचा एकमेकांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलली आहे.’

चित्रपट शूट करताना दोघांमध्ये भांडण झाले होते का असा प्रश्न देखील आमिरला विचारण्यात आला होता. त्यावर आमिर म्हणाला “होय, अनेकदा. लढाईशिवाय आपण चित्रपट बनवू शकत नाही. जिथे आपलं म्हणणं मांडायचं आहे, ते आम्ही पाळतो.”

आमिर खान आणि किरण राव यांनी 16 वर्षे एकत्र संसार केला. पण 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही ते अनेकदा एकत्र दिसतात. यावरूनच आमिरने जे वाक्या म्हटलं की आजही त्यांच्यात प्रेम आहे हे नक्कीच दिसून येत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.