AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मुस्लीम असल्याने..; आमिर खानने सांगितला ‘दंगल’च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा

अभिनेता आमिर खानने पहिल्यांदाच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने शूटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले. 'दंगल' या चित्रपटासाठी आमिरने पंजाबच्या एका छोट्याशा गावात जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शूटिंग केली होती.

मी मुस्लीम असल्याने..; आमिर खानने सांगितला 'दंगल'च्या शूटिंगदरम्यानचा किस्सा
Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2024 | 12:46 PM
Share

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. यावेळी त्याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किस्सा सांगितला. पंजाबमधील एका छोट्याशा गावात शूटिंग करताना ‘नमस्ते’ची ताकद समजली, असं आमिर म्हणाला. पंजाबमधल्या लोकांच्या नम्रतेबद्दल कौतुक करताना आमिर म्हणाला, “पंजाबमध्ये शूटिंगसाठी अडीच महिने राहिल्यानंतर मला ‘नमस्ते’ची खरी ताकद समजली. ही खरंच एक अद्भुत भावना आहे.”

शूटिंगदरम्यानचा किस्सा

आमिरने ‘दंगल’च्या आधी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटासाठीही पंजाबमध्ये शूटिंग केलं होतं. याविषयी त्याने सांगितलं, “ही कथा माझ्या खूप जवळची आहे. रंग दे बसंती या चित्रपटासाठी आम्ही पंजाबमध्ये शूट केलं होतं आणि मला तिथलं वातावरण खूप आवडलं होतं. तिथले लोक, पंजाबी संस्कृती.. तिथले लोक खूपच प्रेमळ आहेत. आम्ही ‘दंगल’साठी तिथल्या एका छोट्याशा गावात शूटिंग करत होतो. तिथल्या एका घरात आम्ही दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस शूटिंगसाठी थांबलो होतो. तुम्हाला विश्वास बसत नाही पण मी जेव्हा पहाटे 5 किंवा 6 वाजता शूटिंगच्या ठिकाणी पोहोचायचो, तेव्हा तिथले लोक फक्त माझ्या स्वागतासाठी येऊन उभे राहायचे. हात जोडून ‘सत स्त्री अकाल’ बोलण्यासाठी ते पहाटे तिथे यायचे. माझ्या स्वागतासाठी ते माझी प्रतीक्षा करायचे. त्यांनी कधीच मला त्रास दिला नाही, माझी कार कधी थांबवली नाही. पॅक-अपनंतर जेव्हा मी घरी जायला निघायचो, तेव्हा पण ते पुन्हा घराबाहेर माझी प्रतीक्षा करायचे.”

पंजाबबद्दल व्यक्त झाला आमिर

“मी मुस्लीम कुटुंबातील असल्याने मला हात जोडून नमस्ते बोलायची सवय नव्हती. ज्याप्रकारे मुस्लिमांमध्ये ‘आदाब’ केलं जातं, मी तसंच आदाब करण्यासाठी एक हात वर करायचो. पण पंजाबमध्ये अडीच महिने राहिल्यानंतर मला नमस्तेची ताकद समजली. ती भावनाच खूप सुंदर होती”, अशा शब्दांत आमिर व्यक्त झाला. कपिलच्या या शोमध्ये आमिरने त्याच्या आयुष्यातील इतरही मजेशीर किस्से सांगितले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.