AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | ‘सलमान शर्ट कढातो तेव्हा….’, अभिषेक बच्चन याच्या वक्तव्यावर ऐश्वर्या राय हिची प्रतिक्रिया

Salman Khan | 'जेव्हा सलमान शर्ट कढातो तेव्हा....', अभिषेक बच्चन याने अभिनेता सलमान खान याच्याबद्दल केलं मोठं वक्तव्य; व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील भाव म्हणजे...

Salman Khan | 'सलमान शर्ट कढातो तेव्हा....', अभिषेक बच्चन याच्या वक्तव्यावर ऐश्वर्या राय हिची प्रतिक्रिया
| Updated on: Aug 18, 2023 | 2:07 PM
Share

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : अनेक वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांचे मार्ग वेगळे झाले. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील आजही दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याने सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. लग्नानंतर 2010 मध्ये दोघेही करण जोहरच्या टॉक शोमध्ये एकत्र पोहोचले होते. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक कॉफी विथ करण या शोमध्ये पोहोचल्यानंतर करण दोघांना असे प्रश्न विचारले जे आजही चर्चेत आहेत.

करण सर्वप्रथम अभिषेक याला विचारतो, ‘इंडस्ट्रीमध्ये स्टायलिस्टची सर्वात जास्त गरज कोणाला आहे?’ यावर अभिषेक स्वतःचं नाव घेतो. पुढे करण विचारतो डान्सिंगचे क्लासची कोणाला अधिक गरज आहे. यावर अभिषेक म्हणतो, ‘करण तुला गरज आहेत… किती दिवसांपासून एकच स्टेप करत आहेस…’

पुढे करण म्हणतो ‘मी काही सेलिब्रिटींची नावं घेईल, त्यांच्याबद्दल एका शब्दात सांगायचं’ हृतिक रोशन याच्यासाठी अभिषेक म्हणतो, ‘आनंदी राहा…’ पुढे करण अभिनेता सलमान खान याचा नाव घेतो, यावर अभिषेक म्हणतो, ‘त्याने आता वर्क आऊट बंद करायला हवं… कारण तो कायम शर्ट काढायला जातो आणि मला वाटतं तो यापेक्षा चांगलं काम करु शकतो…’

सलमान खान याच्या वक्तव्यानंतर ऐश्वर्या काहीही बोलत नाही शांत बसते. शिवाय व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील हाव-भावाची चर्चा तुफान रंगत आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमाच्या सेटवर सुरु झालेली दोघांच्या लव्हस्टोरीचा अंत ‘देवदास’ सिनेमाच्या सेटवर झाला.. पण दोघांच्या नात्याबद्दल चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक आता आनंदी आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुगली देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.