AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा सिनेमा, या दिवशी होणार प्रदर्शित

मुख्यमंत्री विजय यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट जन नायगन आहे. पण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तो प्रदर्शित झाला. आता थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर एक महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी तयार आहे.

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा सिनेमा, या दिवशी होणार प्रदर्शित
Vijay ThapathyImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 18, 2026 | 7:21 AM
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायगन आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता विजय यांचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक महिन्यानंतर ती ओटीटीवर येत आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर कधी आणि कुठे पाहता येईल जाणून घ्या.

कधी आणि कुठे येणार आहे चित्रपट

झी5 तमिळवर एक एआय जनरेटेड टीझर प्रोमो रिलीज करून जन नायगनच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी झी५ वर येणार आहे. जन नायगनचा टीझर शेअर करत सोशल मीडियावर, “थंगमेय… थलापती… जन नायगन तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहेत २१ ऑगस्ट रोजी झी५ वर.”

चित्रपटाने किती केली कमाई?

अनेकदा चित्रपटाच्या रिलीजमध्ये विलंब झाल्यानंतर जन नायगन २३ जुलै रोजी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगायचे झाले तर सॅक्निकच्या अहवालानुसार जन नायगनने भारतात २२७.१४ कोटी आणि जागतिक स्तरावर ३२०.३४ कोटी कमाई केली होती. सुरुवातीला चित्रपट ९ जानेवारी रोजी रिलीज होणार होता, पण सीबीएफसीकडून सर्टिफिकेट मिळण्यात विलंब झाल्याने रिलीज डेट पुढे ढकलली गेली. त्यानंतर निवडणुका झाल्या, त्यामुळे आणखी विलंब झाला आणि शेवटी २३ जुलै रोजी चित्रपट रिलीज झाला.

जन नायगनची कथा

जन नायगनच्या कथेबाबत सांगायचे झाले तर चित्रपटात विजय यांच्यासोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. चित्रपटाची कथा थलापती वेत्री कोंदर यांच्यावर आधारित आहे, जो विजी (ममिता बैजू) ची जबाबदारी घेतो आणि तिला मजबूत व स्वतंत्र महिला बनवू इच्छितो. ती नंतर सैन्यदलात सामील होते. पण तिच्या आयुष्यात तेव्हा एक वळण येते जेव्हा तिला आपल्या जुन्या शत्रूचा सामना करावा लागतो. चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोत यांनी केले असून वेंकट के. नारायण यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध यांनी दिले असून गीते विवेक यांनी लिहिली आहेत. चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत