स्मृती मानधना – पलाश मुच्छल 6 वर्ष …, लग्नात उपस्थित असलेल्या अभिनेत्याने सांगितलं ‘त्या दिवशी’ नेमकं काय घडलं?

Smriti Mandhana and Palash Muchhal: स्मृती मानधना - पलाश मुच्छल यांचं लग्न का मोडलं? लग्नात उपस्थित असलेल्या अभिनेत्याकडून मोठा खुलासा, 'स्मृती आणि पलाश 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतं पण...', सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा

स्मृती मानधना – पलाश मुच्छल  6 वर्ष …, लग्नात उपस्थित असलेल्या अभिनेत्याने सांगितलं ‘त्या दिवशी’ नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana and Palash Muchhal
| Updated on: Feb 05, 2026 | 10:52 AM

Smriti Mandhana and Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटविश्वातील स्टार खेळाडू स्मृती मानधना यांच्या मोडलेल्या नात्याबद्दल आजही सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात. डिसेंबर 2025 मध्ये स्मृती आणि पलाश यांचं लग्न ठरलं होतं. लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण लग्नाच्या 2 तसांपूर्वी स्मृती आणि पलाश यांचं लग्न मोडल्याची बातमी समोर आली. स्मृती हिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे लग्न पुढे ढकलल्याचं कळलं. पण त्यानंतर पलाश याने स्मृती हिची फसवणूक केली म्हणून लग्न मोडण्यात आलं… अशा अनेक चर्चा रंगल्या. एवढंच नाही तर, अन्य मुलींसोबत पलाश याचे फोटो आणि खासगी चॅट देखील समोर आले. त्यानंतर खुद्द स्मृती हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडलं असल्यांचं सांगितलं आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लागला.

आता देखील दोघांच्या रद्द झालेल्या लग्नात उपस्थित राहिलेल्या अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता नंदीश संधू याने पलाश आणि स्मृती यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. लग्नात नक्की काय झालं याबद्दल नंदीश संधू याने मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत नंदीश संधू याने दोघांच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

नंदीश संधू म्हणाला, ‘सध्या याबद्दल काही न बोलणं योग्य राहील आणि जे काही झालं ते पलाश स्वतः सांगेल…’, अभिनेत्याने दावा केला की, ‘कोणीच पलाश याची बाजू समजावून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत…’ एवढंच नाही तर, सांगली याठिकाणी काय झालं याबद्दल नंदीश म्हणाला, ‘मी लग्नात उपस्थित होतो… जे कधी झालंच नाही आणि मला माहिती आहे की, पुन्हा आता हे लग्न होणारच नाही…’

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नात काय घडलं

नंदीश म्हणाला, ‘लग्न पोस्टपोन झालं… अशी माहिती समोर आली.. तेथे देखील असंच काही घडलं होतं. मी तुम्हाला सांगतो… स्मृती हिच्या वडिलांची प्रकृती स्थिर नव्हती… ते रुग्णालयात होते आणि याच कारणामुळे लग्न पोस्टपोन झालं.’ याशिवाय, पलाश यांच्या झालेल्या आरोपांवर नंदीश म्हणाला, ‘नंतर, मला बातम्या आणि माध्यमांमधून कळलं की, हे प्रकाशित झालं आहे आणि घडत आहे. आणि मला त्याबद्दल वाईट वाटलं.’

स्मृती आणि पलाश यांच्या नंदीश म्हणाला, ‘जे काही कारण असेल, ज्यामुळे लग्न झालं नाही. मी दोघांना एकत्र पाहिलं आहे… मी पाहिलं आहे, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दोघे एकमेकांवर प्रेम करत होते… दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं… ते एक चांगलं कपल होतं…’ असं देखील नंदीश म्हणाला.