AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर करदात्यांचे पैसे, कंगनाने नाकारली घर पाडल्याची नुकसान भरपाई

Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 2020 मध्ये बीएमसीने पाडलेल्या तिच्या घरासंदर्भात अभिनेत्रीने पुन्हा एकदा विधान केले आहे.

हे तर करदात्यांचे पैसे, कंगनाने नाकारली घर पाडल्याची नुकसान भरपाई
कंगनाने नाकारली नुकसानभरपाई
| Updated on: May 06, 2023 | 2:21 PM
Share

मुंबई : बॉलीवूडची बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री कंगना रनौ(kangana ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. 2020 मध्ये कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग बीएमसीने पाडला (demolition) होता. ज्यामुळे कंगना खूप संतापली होती आणि तिने उघडपणे अनेक वक्तव्येही केली होती. त्याच वर्षी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली होती. सोशल मीडियावर कंगनाचे चाहते तिला अनेकदा नुकसानभरपाईबाबत प्रश्न विचारतात.

सप्टेंबर 2020 मध्ये, तिला नोटीस बजावल्यानंतर एका दिवसात, कंगनाच्या घर-कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर बांधकामामुळे पाडण्यात आला. त्यावेळी कंगना आणि शिवसेना यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू होते. अशा परिस्थितीत कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान घराचा एक भाग पाडल्याच्या भरपाईबाबत प्रश्न केला. त्यावर कंगनाने जे उत्तर दिले, ते ऐकून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.

कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिला कोणतीही भरपाई मिळालेली नाही, ते तिला एक मूल्यांकनकर्ता (evaluator) पाठवणार होते. त्यामुळे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कंगना पुढे म्हणाली की तुम्हीच मला मुल्यांकन करून पाठवा. करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करणारे इतर कोणी मला नकोत. मला आणखी भरपाई नकोय, जे आहे ते ठीक आहे असेही कंगनाने नमूद केले

ती पुढे म्हणाली, “न्यायालयाने सांगितले आहे की त्यांनी मला कितीही नुकसान भरपाई द्यावी, परंतु मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधीही मूल्यांकनकर्त्यांना पाठवले नाही आणि मी मागणी केली नाही कारण मला करदात्यांच्या पैशाची माहिती आहे आणि मला त्याची गरज नाही.”

कामाबद्दल सांगायचे झाले तर कंगना इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनातही पाऊल टाकणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.