AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांच्यात रोज होतात वाद? खुद्द अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण, ऐश्वर्या म्हणाली, 'आमच्यात रोज वाद होतात...', यावर अभिषेक म्हणाला...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा

अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय यांच्यात रोज होतात वाद? खुद्द अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
| Updated on: Dec 05, 2023 | 10:04 AM
Share

मुंबई | 5 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असतात. अभिषेक – ऐश्वर्या कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसत नाहीत. कार्यक्रम किंवा कोणत्याही ठिकाणी ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचते. नुकताच ऐश्वर्या हिचा वाढदिवस झाला. तेव्हा ऐश्वर्या हिच्यासोबत फक्त आई आणि मुलगी होती. अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर फक्त पत्नीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. अशात दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं..

धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढल्याची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान रंगत आहे. दरम्यान अभिषेक – ऐश्वर्या यांनी जुन्या मुलाखतीत केलेलं वक्तव्य तुफान व्हायरल होत आहे. ‘अभिषेक आणि माझ्यात रोज वाद होतात…’ असं वक्तव्य ऐश्वर्या हिने 2010 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत केलं होतं.

ऐश्वर्या हिने केलेल्या वक्तव्यावर अभिषेक म्हणाला, ‘आमच्यामध्ये होणारे वादनसून असहमती असते. हे वाद क्षणात मिटणारे असतात. महत्त्वाचं म्हणजे नात्यात उतार – चढाव येत असतात. ते नसतील तर आयुष्य पुर्णपणे बोरिंग होईल.. आम्ही आमच्यातील असहमती दूर करण्याचा प्रयत्न करतो.’ एवढंच नाही तर तेव्हा अभिनेत्याने पुरुषांना एक सल्ला देखील दिला होता. ‘महिला कायम योग्य असतात आणि त्या राहातील… हे गोष्ट पुरुषांना कळली तर, त्यांचं आयुष्य अधिक सोपं होईल…’

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा विचार केला. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक – ऐश्वर्या यांनी कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिने आई-वडिलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अभिषेक – ऐश्वर्या दोघे आराध्या हिचा फोटो पोस्ट करत लेकीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. आराध्या हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देखील अभिषेक – ऐश्वर्या यांनी फक्त आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट केलं. म्हणून अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. पण रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.