AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alka yagnik Birthday Special: तिने 2 हजार गाणी गायली पण 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळी राहिली, का? जाणून घ्या अलका याज्ञिक विषयी सर्व काही…

Alka yagnik Birthday Special : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे.

Alka yagnik Birthday Special: तिने 2 हजार गाणी गायली पण 27 वर्ष नवऱ्यापासून वेगळी राहिली, का? जाणून घ्या अलका याज्ञिक विषयी सर्व काही...
Alka yagnik
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 20, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई : फक्त बॉलीवुडच नाही तर 16 भाषांमध्ये गाणं गायलेल्या सिंगर अलका याज्ञिक (Alka yagnik ) यांचा आज 55 वा वाढदिवस. बॉलिवुडचं यश पाहिलेली गायिका म्हणून अलकांची ओळख आहे. पण हेच यश मिळवण्यासाठी जीवन किती खडतरपणे जगावं लागलं तेही महत्वाचं आहे. (Alka yagnik married life facts know her husband)

अलका याज्ञिक यांचं तपश्चर्यने घडलेलं करिअर

अलका याज्ञिक यांनी वयाच्या 14 व्या वर्षी म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. प्यार की झंकार, ‘मेरे अंगने मे’ सारखे सुरुवातीला हिट गाणे दिले. आज घडीला जवळवास 2 हजार गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी फक्त हिंदीच नाही तर 16 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलीत. पण सुपरहिट असलेलं पहिलं गाणं होतं, तेजाबमधलं ‘एक दोन तीन…’. याच गाण्यावर माधुरी दिक्षितने काही पिढ्यांना भुरळ पाडली. अलका याज्ञिक यांनाही पहिलं फिल्मफेअर याच गाण्यासाठी मिळालं. पण या यशाच्या पाठीमागे काही खडतर निर्णय आहेत.

लग्न आणि दुरावा

अलका याज्ञिक ह्या कोलकात्याच्या. एका गुजराती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात संगिताचं वातावरण होतं. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या भजन किर्तन गायच्या. नंतर बॉलिवुडमध्ये चांगलं बस्तान बसवलं. 1989 ला त्यांनी उद्योगपती नीरज कपूर यांच्याशी लग्न केलं. नीरज हे शिलॉंगचे. पण लग्न करुनही दोघांना एक नाही दोन नाही तर 27 वर्ष एकमेकांपासून दूर रहावं लागलं.

नवऱ्यापासून का रहावं लागलं 27 वर्ष दूर

सध्याचा काळ हा लाँग डिस्टन्सिंग रिलेशनशिपचा आहे. पण ज्या काळात अलका याज्ञिक नवऱ्यापासून एवढ्या मोठा काळ दूर राहिल्या तेव्हा अशा संबंधांचा फार बोलबाला नव्हता. अलका याज्ञिक यांचे पती नीरज कपूर हे शिलाँगला बिजनसमॅन होते. त्यांचा सगळा व्यवसाय तिथेच होता. अलका याज्ञिकांना मुंबईत रहावं लागायचं. कारण त्यांचं काम, गाणं सगळं मायानगरीत होतं. अलकासाठी मुंबईत येऊन नीरज कपूर यांनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. शेवटी अलका यांच्याच सांगण्यावरून ते परत शिलाँगला गेले आणि तिथंच व्यवसाय केला. अधूनमधून ते मुंबईत यायचे. अशा पद्धतीनं त्यांना 27 वर्ष एकमेकांसोबत लग्न होऊनही लाँग डिस्टन्स रिलेशिनशिपमध्ये रहावं लागलं. अलका याज्ञिक यांनी मुलांचा एकहाती सांभाळ केला.

(Alka yagnik Birthday Special Alka married life facts know her husband)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक