AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिस चौकशी दरम्यान कोणते प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आले?; अभिनेत्याने दिली सर्व प्रश्नांची चोख उत्तरे

अल्लू अर्जुन यांना 'पुष्पा 2' च्या प्रीमियर शोमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत पोलिसांनी चौकशी केली. रेवती नावाच्या महिलेच्या मृत्यूबाबत त्याला विचारण्यात आले. अल्लू अर्जुन यांनी पोलिसांची परवानगी नसतानाच प्रीमियरमध्ये उपस्थित राहिल्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. पोलिसांनी प्रीमियरचा सीन रिक्रिएट करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस चौकशी दरम्यान कोणते प्रश्न अल्लू अर्जुनला विचारण्यात आले?; अभिनेत्याने दिली सर्व प्रश्नांची चोख उत्तरे
| Updated on: Dec 24, 2024 | 5:37 PM
Share

हैदराबाद संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन पोलीस ठाण्यात रवाना झाला आहे. अल्लू अर्जुनला चौकशी करण्यासाठी बोलण्यात आले. अल्लू अर्जुन कायदेशीर पथकासह चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात रवाना झाले आहेत.

तत्पूर्वी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या हातात लाठ्या दिसल्या. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.

पोलिसांच्या चौकशीत अल्लू अर्जुनने दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

पोलिसांच्या चौकशीनंतर अल्लू अर्जुन पोलिस स्टेशनमधून निघून गेला आहे. त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना त्याने उत्तरे दिली. चौकशीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे का? तर यावर अल्लू अर्जुन म्हणाला की हो, मला दुसऱ्या दिवशी याची माहिती मिळाली.

तसेच अल्लू अर्जुनची एसीपी रमेश आणि सीआय राजू यांच्या देखरेखीखाली चौकशी केली जात आहे. यावेळी अल्लू अर्जुनसोबत त्याचे वकील अशोक रेड्डीही होते. महत्त्वाचं म्हणजे अल्लू अर्जुनच्या टीम हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये नेऊन पुष्पा-२ च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती त्याचा सीन चौकशीचा भाग म्हणून रिक्रिएट करण्यात येणार असल्याचंही म्हटलं जातं.

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी (रिपोर्टनुसार मिळालेली माहिती)

दरम्यान संध्याने थिएटरमध्ये येऊ नये असे व्यवस्थापनाने तुम्हाला आधी सांगितले होते का?

तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती?

तुम्हाला माहीत नव्हते का?

तुला संध्या थिएटरच्या प्रीमियर शोमध्ये येण्याची परवानगी मिळाली होती का?

तुमच्याकडे त्याची प्रत आहे का?

तुम्ही किती बाऊन्सरची व्यवस्था केली? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

अल्लू अर्जुनच्या घरावर पूर्णपणे नाकाबंदी

तसेच रविवारी झालेल्या हल्ल्यासारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या घरावर पूर्णपणे नाकाबंदी केली आहे. तर, दुसरीकडे, हैदराबाद पोलिसांनी रविवारी संध्या थिएटरचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते, ज्यामध्ये अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात थिएटरमधून बाहेर पडताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला थिएटर सोडण्याची विनंती केली नसल्याचा दावा अभिनेत्याने केल्यानंतर हे फुटेज समोर आले आहे.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे म्हणणे आहे की, अल्लू अर्जुनने पोलिसांची परवानगी नसतानाही प्रीमियरमध्ये भाग घेतला होता. त्याने दावा केला की अभिनेत्याने थिएटर सोडण्यास नकार दिला होता, ज्यामुळे पोलिसांना त्याला जबरदस्तीने काढून टाकावे लागले. आता अल्लू अर्जुनच्या चौकशीत अजून किती गोष्टी समोर येणार हे पाहणे महत्तवाचे आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.