AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला ८ दिवस उलटले आहेत. या ८ दिवसांत अनेक स्टार्सनी या घटनेचा निषेध केला आणि संताप व्यक्त केला. पण हल्ल्यापासून अमिताभ बच्चन यांनी मौन बाळगले आहे. तो ज्या पद्धतीने X ला प्रतिक्रिया देत आहे त्यावरून हे स्पष्ट होते की त्याला या घटनेचा खूप धक्का बसला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त 'या' गोष्टी
Amitabh Bachchan silence tweetImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2025 | 5:11 PM
Share

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या भ्याड हल्ल्यात 27 निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला आहे. सर्वत्र या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात आहे. हल्ल्यानंतर लोक सतत विविध माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. या हल्ल्यावर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मात्र तेव्हापासून मौन बाळगलं आहे.

फक्त नंबर लिहिलेली पोस्ट 

हा दहशतवादी हल्ला गेल्या आठवड्यात मंगळवार 22 एप्रिल रोजी करण्यात आला. तेव्हापासून, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर अनेक पोस्ट केल्या आहेत, परंतु त्यांच्या सर्व पोस्टमध्ये फक्त पोस्ट नंबर लिहिलेला आहे, अमिताभ बच्चन यांनी काहीही वाक्य लिहिलेलं नाही किंवा कोणताही शब्द लिहिला नाही. ते केवळ एक नंबर लिहून पोस्ट करत आहेत. पहलगाम हल्ल्यावरच नाही तर त्यांनी इतर कोणत्याही मुद्द्यावर काहीही मत व्यक्त केलेलं नाही.

अमिताभ बच्चन यांना धक्का बसला?

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक्स वर अनेक पोस्ट शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच ते त्याच्या फॉलोअर्सबद्दल काळजीत असल्याचे दिसून आले होते. पण दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना कदाचित मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. ते काहीच बोलत नाहीये. शब्दांशिवाय पोस्ट करत आहेत.

22 एप्रिलपासून बिग बींनी मौन बाळगले आहेत

हल्ल्यापूर्वी 22 एप्रिल रोजी रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांनी X वर लिहिले होते, “T 5355 शांत X गुणसूत्र… मेंदू ठरवते.” (हे बिग बींचे 5355 वे ट्विट होते). त्याच दिवशी दुपारी पहलगाममध्ये हल्ला झाला आणि अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. तेव्हापासून लोक संतापलेले आहेत. आणि तेव्हापासून अमिताभ बच्चन यांनीही मौन बाळगलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये एकही शब्द नाही

बिग बी यांनी 23 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल, 26 एप्रिल, 27 एप्रिल, 28 एप्रिल (दोन पोस्ट), 29 एप्रिल आणि 30 एप्रिल रोजी एक्स वर पोस्ट शेअर केल्या. पण त्यांनी या पोस्टमध्ये काहीही लिहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटवरून हे स्पष्ट होते की त्यांना या हल्ल्याचे खूप दुःख झाले आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाही आहेत.

सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.