AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | सुशांत सिंह राजपूतनंतर पुन्हा प्रेमात पडण्याविषयी काय म्हणाली अंकिता लोखंडे?

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सहा वर्षे सुशांतला डेट केल्यानंतर अंकिताचं त्याच्याशी ब्रेकअप झालं होतं. सुशांतनंतर आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम कसं आलं, याविषयीही तिने सांगितलं.

Ankita Lokhande | सुशांत सिंह राजपूतनंतर पुन्हा प्रेमात पडण्याविषयी काय म्हणाली अंकिता लोखंडे?
Ankita Lokhande and Sushant Singh RajputImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 16, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नातं सर्वश्रुत होतं. त्यामुळे जेव्हा 2020 मध्ये सुशांतचं निधन झालं, तेव्हा या दोघांचं नातं पुन्हा जोरदार चर्चेत आलं होतं. त्यावेळी अंकिता बिझनेसमॅन विकी जैनला डेट करत होती. डिसेंबर 2021 मध्ये अंकिताने त्याच्याशी लग्न केलं. मात्र सुशांतच्या निधनाचा काळ या दोघांच्या नात्यासाठीही बऱ्याच चढउतारांचा होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सहा वर्षे सुशांतला डेट केल्यानंतर अंकिताचं त्याच्याशी ब्रेकअप झालं होतं. सुशांतनंतर आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम कसं आलं, याविषयीही तिने सांगितलं.

अंकिताची प्रतिक्रिया

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “जे काही घडलं होतं आणि त्याच्याही दोन वर्षांनंतर माझा प्रेमावरून कधीच विश्वास उडाला नव्हता. माझ्या आयुष्यात प्रेम पुन्हा येईल आणि त्यासाठी मी बनली आहे, असा आत्मविश्वास मला होता. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच असेल जी माझी स्वप्नं पूर्ण करेल, जो माझ्याशी लग्न करेल, असं मला नेहमीच वाटायचं. मी प्रेमाला कधीच नकार देऊ शकली नाही. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच आहे, यावर मला कायम विश्वास होता.”

सुशांतविषयी काय म्हणाला अंकिताचा पती?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताचा पती विकी जैनसुद्धा त्यांच्या नात्याविषयी आणि सुशांतविषयी व्यक्त झाला. “आयुष्यात तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा काही परिस्थितींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. माझा नेहमीच असा विश्वास आहे की जर तुम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली असेल तर तुम्ही आपोआप एक टीम बनता. त्यामुळे तिच्यासोबत त्यावेळी जे काही घडत होतं, ते फक्त तिचंच नव्हतं. मी सुद्धा तिच्या पाठिशी तिथे खंबीरपणे उभा होतो”, असं विकी म्हणाला.

सुशांतच्या निधनानंतर अंकितालाही बऱ्याच घडामोडींचा सामना करावा लागला होता. माध्यमांनाही तिने काही मुलाखती दिल्या होत्या आणि सुशांतच्या कुटुंबीयांचीही तिने भेट घेतली होती. “सुशांतच्या निधनानंतर विविध वृत्त समोर येत होत्या आणि त्यात सर्वच गोष्टी सांगितल्या जात नव्हत्या. त्यावेळी अंकिताकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. केवळ यासाठी नाही की सुशांत आणि ती रिलेशनशिपमध्ये होते. पण एक माणूस म्हणूनही तिने ते करणं गरजेचं होतं”, असं विकीने स्पष्ट केलं.

अंकिता आणि सुशांत ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2016 मध्ये त्यांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.