AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली ‘अनुपमा’ मालिका; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

'अनुपमा' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका असून यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. आता एक प्रसिद्ध कलाकार या मालिकेचा निरोप घेत आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. त्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

या प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली 'अनुपमा' मालिका; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!
Anupamaa teamImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 29, 2024 | 10:11 AM
Share

‘अनुपमा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने आतापर्यंत टीआरपीचे सर्व विक्रम मोडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेच्या कथानकात लीप येणार असल्याची चर्चा होती. या लीपनंतर अनुपमाची मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली आणि अनुजची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव खन्ना मालिकेत दिसणार नाही, असंही म्हटलं जात होतं. मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याने या मालिकेला रामराम केला आहे. ‘अनुपमा’मध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं ही मालिका सोडली आहे. खुद्द सुधांशूने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुधांशूने इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलही घोषणा केली आहे. त्यात तो म्हणतोय, “तुम्हा सर्वांना माहितच आहे की मी गेल्या चार वर्षांपासून अनुपमा या मालिकेशी जोडला गेलोय. या भूमिकेमुळे मला खूप सारं प्रेम आणि तेवढीत प्रेक्षकांची नाराजीसुद्धा मिळाली. पण ती नाराजी माझ्यासाठी प्रेमच आहे. कारण जर तुम्ही माझ्यावर नाराज झाले नसता, तर मी माझं काम योग्य करतोय असं वाटलंच नसतं. आज मीा तुम्हाला जड अंत:करणाने हे सांगू इच्छितो की मी यापुढे अनुपमा या मालिकेत दिसणार नाही. रक्षाबंधनपासूनच मी ही मालिका सोडली आहे. इतके दिवस झाले आणि माझ्या प्रेक्षकांना असं वाटू नये की मी न सांगताच निघून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. आता मी या मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारताना दिसणार नाही. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि माफ करा कारण मला अचानक हा निर्णय घ्यावा लागला आहे.”

सुधांशूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या एक्झिटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘वनराज शाहची भूमिका तुझ्याशिवाय दुसरं कोणी उत्तम साकारूच शकत नाही. तुम्ही खूप चांगले अभिनेते आहात’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आधी समर, नंतर पाखी आणि आता वनराज.. मालिकेतून सगळे चांगले कलाकार बाहेर पडतायत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आता ही मालिका मी बघू शकत नाही’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण