AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Pandey | ‘ही’ मराठी अभिनेत्री होती नितेश पांडे यांची पहिली पत्नी; लग्नाच्या 4 वर्षांतच तुटलं नातं

मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या खोलीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नितेश हे कामात असतील म्हणून कर्मचाऱ्याने मध्यरात्री पुन्हा एकदा फोन केला. तेव्हासुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.

Nitesh Pandey | 'ही' मराठी अभिनेत्री होती नितेश पांडे यांची पहिली पत्नी; लग्नाच्या 4 वर्षांतच तुटलं नातं
Nitesh PandeyImage Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2023 | 10:33 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचं मंगळवारी इगतपुरी इथल्या एका हॉटेलमध्ये हृदयविकाराने निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. ‘अनुपमा’ या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारली होती. याशिवाय अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. नितेश यांनी दोन लग्न केले होते. त्यांचं पहिलं लग्न एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितेश यांनी दुसरं लग्न केलं.

नितेश यांची पहिली पत्नी अभिनेत्री अश्विी काळसेकर होती. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. तर 2002 मध्ये नितेश आणि अश्विनी यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. अश्विनीला घटस्फोट दिल्यानंतर नितेश त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे निघून गेले. टीव्ही अभिनेत्री अर्पिता पांडेवर त्यांचा जीव जडला. ‘जुस्तजू’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अश्विनीला घटस्फोट दिल्यानंतर एका वर्षाने नितेश यांनी दुसरं लग्न केलं होतं. 2003 मध्ये त्यांनी अर्पिताशी लग्नगाठ बांधली.

नितेश आणि अर्पिता यांना एक मुलगा असून त्याचं नाव आरव असं आहे. नितेश हे त्यांचं खासगी आयुष्य माध्यमांपासून दूर ठेवायचे. सेलिब्रिटी असले तरी सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याला त्यांनी प्राधान्य दिलं होतं. कोणत्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्येही त्यांना फारसं पाहिलं जायचं नाही.

हॉटेलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले

नितेश पांडे हे इगतपुरीतील एका हॉटेलमध्ये कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांच्या खोलीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नितेश हे कामात असतील म्हणून कर्मचाऱ्याने मध्यरात्री पुन्हा एकदा फोन केला. तेव्हासुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्याला संशय येऊन त्याने हॉटेलच्या मॅनेजरला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतरच मॅनेजरने दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता नितेश हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.

नितेश पांडे यांनी ‘बाझी’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ओम शांती ओम’, ‘खोसला का घोसला’, ‘दबंग 2’, ‘हंटर’, ‘मदारी’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘रंगून’, ‘बधाई दो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय अनेक मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.