AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडियाच्या ‘विराट’ विजयावर अनुष्काची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

IND vs PAK | टीम इंडियाचा विजय, अनुष्काला भावना अनावर म्हणाली, "ही माझ्या आयुष्यातली..."

IND vs PAK | टीम इंडियाच्या 'विराट' विजयावर अनुष्काची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली...
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2022 | 7:23 PM
Share

मुंबई- मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियाने आज पाकिस्तानवर (IND vs PAK) दमदार विजय मिळवला. या विजयाचा खरा नायक विराट कोहली (Virat Kohli) ठरला. विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा फटकावल्या आहेत. संपूर्ण देशासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरला. या खेळानंतर मैदानात विराट भावूक झाला होता. विराटच्या प्रत्येक सुखादु:खात साथ देणारी त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. टीम इंडियाचा विजय पाहून अनुष्कालाही भावना अनावर झाल्या.

अनुष्का शर्माची पोस्ट-

‘सुंदर, अत्यंत सुंदर! आज रात्री तू अनेकांच्या आयुष्यात आनंद आणलंस आणि तोही दिवाळीच्या पूर्वसंध्येला. तू खरंच एक अद्भुत व्यक्ती आहेस. तुझी जिद्द, तुझा विश्वास जबरदस्त आहे. मी हे नक्की म्हणू शकते की मी माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम सामना आज पाहिला,’ अशा शब्दांत अनुष्काने आनंद व्यक्त केला.

‘आपली मुलगी हे समजण्यासाठी आता खूप लहान आहे की तिची आई आनंदाने का नाचत होती? पण एके दिवशी तिला हे समजेल की तिच्या वडिलांनी त्या रात्री आपली सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी हा टप्पा खूप कठीण होता, पण तो त्यातून आधीपेक्षा अधिक मजूबत आणि यशस्वीपणे बाहेर आला. मला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्यावर माझं कायम प्रेम असेल,’ असं तिने पुढे लिहिलं.

प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. मी कृतज्ञ आहे आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, अशा शब्दांत विराटनेही भावना व्यक्त केल्या.

रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर विराट कोहली भावूक झाला होता. आधी तो आनंदाने ओरडला पण नंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. विराट कोहलीला अनेकदा विजयानंतर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना पाहिलं गेलं. पण आज पहिल्यांदाच चॅम्पियन कोहलीच्या डोळ्यात पाणी होतं. विराटसोबत हार्दिक पंड्यासुद्धा भावूक झाला होता.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.