AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi | ‘ती फक्त माझ्या मुलाची आई..’; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त

अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआशी दुसरं लग्न केलं. रुपाली यांच्याशी पहिल्यांदा भेट कशी झाली आणि दुसऱ्या लग्नाबाबतच्या निर्णयावर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

Ashish Vidyarthi | 'ती फक्त माझ्या मुलाची आई..'; दुसऱ्या लग्नाबाबत आशिष विद्यार्थी झाले व्यक्त
पिलू विद्यार्थी, आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नी
| Updated on: Dec 27, 2024 | 10:38 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी रुपाली बरुआ यांच्याशी दुसरं लग्न केलं. 25 मे रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. याआधी त्यांनी अभिनेत्री राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांमध्ये त्यांचीच चर्चा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशिष यांनी रुपाली यांच्यासोबत पहिली भेट कशी झाली आणि दुसऱ्या लग्नाच्या निर्णयानंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

रुपाली यांच्याशी पहिली भेट कशी झाली?

“पिलूशी घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर माझ्या एका व्लॉगिंगच्या असाइनमेंटदरम्यान रुपालीशी पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीत आमची चांगली मैत्री झाली. रुपालीने तिच्या आयुष्यातील दु:ख माझ्यासमोर मांडलं. पाच वर्षांपूर्वी तिने तिच्या पतीला गमावलं होतं. मात्र त्यानंतर तिने लग्नाचा कधी विचार केला नव्हता. पण जसजसं आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, तसतसं जाणवलं की रुपाली तिच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीकोनातून बघू शकते आणि पुन्हा एकदा लग्नाचा विचार करू शकते. ती 50 वर्षांची आहे आणि मी 57 वर्षांचा आहे. आम्ही लग्न का करू नये? वय आणि इतर गोष्टींचा विचार न करता आपण सर्वजण खुश राहू शकतो. आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे हेच माझ्या आयुष्यातील मुख्य उद्दिष्ट आहे आणि तीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे”, असं ते म्हणाले.

दुसऱ्या लग्नानंतर कुटुंबातील वातावरण

आशिष यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुटुंबीयांवर काय परिणाम झाला याबद्दलही ते व्यक्त झाले. ते पुढे म्हणाले, “पिलू आणि माझ्या लग्नाच्या बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत, ज्या आम्ही एकमेकांच्या मनात कायम जपून ठेवणार आहोत. पिलू ही फक्त माझ्या मुलाची आई आहे, असं मी तिला कधीच समजलो नाही. पिलू ही माझी मैत्रीण आहे, ती माझी पत्नी होती. हे सर्व कोणत्याही दु:खाशिवाय झालं असं कृपया समजू नका. एका व्यक्तीपासून विभक्त होणं हे नेहमी दु:खदायकच असतं. ती संपूर्ण प्रक्रिया खूप कठीण असते. पिलू आणि मी या दु:खातून गेलो आहोत. पण अखेर हा तुमचा निर्णय असतो की तुम्हाला त्या दु:खासोबत जगायचं आहे की त्यातून पुढे जायचं आहे. आयुष्य हे असंच असतं.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.