AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजून एक पायरी वर चढलो..”; पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

अजून एक पायरी वर चढलो..; पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
Ashok SarafImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2025 | 12:34 PM
Share

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सात जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याविषयी अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला. “गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. यावर्षाची सुरुवात देशातील प्रतिष्ठेचा सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराच्या घोषणेनं झाली. अजून एक पायरी वर चढलो. मी आजवर जे काम केलं, त्याची देशपातळीवरही दखल घेतली गेली, याचा आनंद वाटतो. रसिक प्रेक्षकांच्या सदिच्छा माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या प्रेमाशिवाय हे यश साध्य झालं नसतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याविषयी ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. मी आणखी पायरी वर चढलोय. पद्मश्री हा भारत सरकारचा पुरस्कार आहे. त्यामुळे मी अधिक आनंदी आहे. आपल्याला काहीतरी मिळावं अशी माझी इच्छा होती, पण इतकं मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. कलाकार पहिल्यांदा रंगभूमीवर तयार होतो. आपल्या मराठी कलाविश्वात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. आम्ही इतक्या वर्षांपासून मेहनत केली, त्यावर आता भारत सरकारकडून शिक्का बसला. मी सरकारचा ऋणी आहे.” यावेळी अशोक सराफ यांना बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो.”

पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांमध्ये 23 महिला असून 10 जण परदेशी नागरिक आहेत. 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला. अशोक सराफ यांच्यासोबतच वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली, सुलेखनकार अच्युत पालव, बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, चित्रकार वासुदेव कामत, वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार, पारंपरिक विणकाम आणि हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर, गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, ब्राझीलमध्ये वेदान्त आणि गीता शिकवणारे अध्यात्मिक गुरू जोनास मासेट्टी, कुवेतमधील योग प्रशिक्षक शेखा एजे अल सबा, माजी क्रिकेटपटू आर. अश्विन, पॅरालिम्पिक तिरंदाज हरविंदर सिंग, गायिका जरपिंदर नरुला, गायक अरिजीत सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच