AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सिने आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांनी शोक व्यक्त केला.

महाराष्ट्राचा सूर हरपला..., आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त
| Updated on: Apr 12, 2026 | 1:28 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली, सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे.

आशा ताईंच्या निधनानंतर अभिनेते अशोक सराफ म्हणाले, एकदा त्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. माझ्याच सिनेमासाठी रेकॉर्डिंग सुरु होतं… मी देखील रेकॉर्डिंगसाठी गेलेलो… तेव्हा मध्ये ‘काय’ असा शब्द बोलायचा होता… ‘तमाशा’ सिनेमातील लावणीचं गाणं होतं… तेव्हा ‘काय’ हा शब्द म्हणण्यासाठी त्यांनी मला आग्रह केला… त्यांनी मला ते म्हणायलाच लावलं.. त्यांच्यासोबत उभं राहून म्हणणं म्हणजे… मी आधीच खूप घाबरलेलो तेव्हा मी काय म्हणालो, ते मला आता आठवत देखील नाही…

आमची भेट कधी व्हायची नाही. कारण क्षेत्र वेगळी होती. पण जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो. आता देखील आहे.. त्याही माझ्या होत्या… ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे… त्यांचा आवाज म्हणजे असा आवज परत होणे नाही… असं म्हणत अभिनेते अशोक सराफ दुःख व्यक्त केलं…

अभिनेते महेश कोठारे यांनी देखील आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला… ‘अशा ताई यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झालं आहे… ‘जीवलगा’ सिनेमात त्यांनी प्लेबॅक दिलेला. मी मुद्दाम त्यांच्यासाठी थांबलेलो. कारण मला त्या गाण्यासाठी आशाताईच हव्या होत्या. आता त्यांची खूप आठवण येईल… आशा ताई यांनी यांनी अनेक गाणी गायली आहेत.’

आशीष शेलार यांनी देखील दुःख व्यक्त केलं. ‘आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडला आहे… आज एका युगाचा अंत झाला आहे. आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आपल्या आशा ताई यांचं आसणं हेच आपल्याला समाधान देणारं होतं. दुःखाला स्वतःला कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कतृत्व पूर्ण भारताला नाही तर, पूर्ण जगाला वेड लावणार होतं…

आशा ताई यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, आज सर्व मेडीकल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पारिवारीक विधी पूर्ण होतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण भेटणार आहोत. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे… शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहे. ‘मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या तारा आशा भोसले यांचं निधन झालं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर, त्या आशा ताई होत्या. आशाताईंचं व्यक्तीमत्व जिंदादिल होतं.. आशाताईंची 100 वी करण्याची संधी काळाने दिली नाही… ‘

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....