AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा सूर हरपला…, आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सिने आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांनी शोक व्यक्त केला.

महाराष्ट्राचा सूर हरपला..., आशा ताईंच्या निधनावर अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शोक व्यक्त
| Updated on: Apr 12, 2026 | 1:28 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं आहे. शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली, सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे.

आशा ताईंच्या निधनानंतर अभिनेते अशोक सराफ म्हणाले, एकदा त्यांचं रेकॉर्डिंग सुरु होतं. माझ्याच सिनेमासाठी रेकॉर्डिंग सुरु होतं… मी देखील रेकॉर्डिंगसाठी गेलेलो… तेव्हा मध्ये ‘काय’ असा शब्द बोलायचा होता… ‘तमाशा’ सिनेमातील लावणीचं गाणं होतं… तेव्हा ‘काय’ हा शब्द म्हणण्यासाठी त्यांनी मला आग्रह केला… त्यांनी मला ते म्हणायलाच लावलं.. त्यांच्यासोबत उभं राहून म्हणणं म्हणजे… मी आधीच खूप घाबरलेलो तेव्हा मी काय म्हणालो, ते मला आता आठवत देखील नाही…

आमची भेट कधी व्हायची नाही. कारण क्षेत्र वेगळी होती. पण जसा मी त्यांचा जबरदस्त फॅन होतो. आता देखील आहे.. त्याही माझ्या होत्या… ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे… त्यांचा आवाज म्हणजे असा आवज परत होणे नाही… असं म्हणत अभिनेते अशोक सराफ दुःख व्यक्त केलं…

अभिनेते महेश कोठारे यांनी देखील आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला… ‘अशा ताई यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झालं आहे… ‘जीवलगा’ सिनेमात त्यांनी प्लेबॅक दिलेला. मी मुद्दाम त्यांच्यासाठी थांबलेलो. कारण मला त्या गाण्यासाठी आशाताईच हव्या होत्या. आता त्यांची खूप आठवण येईल… आशा ताई यांनी यांनी अनेक गाणी गायली आहेत.’

आशीष शेलार यांनी देखील दुःख व्यक्त केलं. ‘आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखात बुडला आहे… आज एका युगाचा अंत झाला आहे. आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आपल्या आशा ताई यांचं आसणं हेच आपल्याला समाधान देणारं होतं. दुःखाला स्वतःला कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कतृत्व पूर्ण भारताला नाही तर, पूर्ण जगाला वेड लावणार होतं…

आशा ताई यांच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, आज सर्व मेडीकल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पारिवारीक विधी पूर्ण होतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण भेटणार आहोत. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे… शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहे. ‘मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या तारा आशा भोसले यांचं निधन झालं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर, त्या आशा ताई होत्या. आशाताईंचं व्यक्तीमत्व जिंदादिल होतं.. आशाताईंची 100 वी करण्याची संधी काळाने दिली नाही… ‘

Follow Us
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.