AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली ‘ही’ अभिनेत्री पतीसोबत करतेय १६० मुलांचा सांभाळ

लग्नानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडचा घेतला निरोप; तिच्या लग्नाला ३० वर्ष पूर्ण झाली असून आता पतीसोबत करते तब्बल १६० मुलांचा सांभाळ... नक्की काय आहे सत्य?

एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेली 'ही' अभिनेत्री पतीसोबत करतेय १६० मुलांचा सांभाळ
ayesha jhulka
| Updated on: Feb 06, 2023 | 9:32 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी एका सिनेमात मुख्य भूमिका साकारली आणि एका रात्रीत चाहत्यांच्या मनात घर केलं. अशाच अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे अभिनेत्री आयशा जुल्का (Ayesha Jhulka). आयशा जुल्का हिने अभिनेता सलमान खान याच्यासोबत ‘कुर्बान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आयशा हिने अभिनेता आमिर खान स्टारर ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आणि एका रात्रीत स्टार झाली. पण आयशा जुल्का हिची लोकप्रियता अधिक काळ टिकून राहिली नाही. ‘दलाल’ सिनेमानंतर अभिनेत्रीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. आयशा हिने २७ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये ५२ सिनेमांमध्ये काम केलं. (ayesha jhulka movies)

रिपोर्टनुसार, आयशा जुल्का हिने ज्या सिनेमांमध्ये काम केलं, त्या सिनेमातील अभिनेत्याला डेट केलं. आयशा जुल्का हिचं नाव नाना पाटेकर, सलमान, मिथुन, अक्षय कुमार यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने २००३ साली उद्योजक समीर वाशी (Sameer Vashi) यांच्यासोबत लग्न केलं आणि बॉलिवूडचा निरोप घेतला.

आयशा आणि समीर यांच्या लग्नाला जवळपास ३० वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांना स्वतःचं बाळ नाही. अशात अनेकदा आयशा हिला फॅमिली प्लानिंगबद्दल विचारण्यात आलं. एका मुलाखतीत अभिनेत्रीने फॅमिली प्लानिंगबद्दल मोठा खुलासा केला. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, तिला स्वतःचं मुल नाही पण अभिनेत्री तब्बल १६० मुलांचा सांभाळ करते. (ayesha jhulka father name)

आयशा म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्वतःच्या मुलांबद्दल असलेला माझा निर्णय जेव्हा मी माझ्या पतीला सांगितला तेव्हा त्यांनी माझा निर्णय मान्य केला. लग्नानंतर मी आणि समीर याने गुजरात येथील दोन गाव दत्तक घेतली आहेत.’ (ayesha jhulka children)

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘गुजरात मधील दोन गावात असलेल्या १६० मुलांचा खाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च आम्ही दोघे मिळून करतो. मातृत्वाबद्दल बोलायचं झालं तर, मी १६० मुलांना मुंबईमध्ये आणू शकत नाही. त्यामुळे मी गावी जावून मातृत्वाचा आनंद घेते. स्वतःचं मुल न करण्याचा निर्णय आमच्या दोघांचा होता आणि आज आम्ही आनंदी आहोत.’ असं देखील आयशा म्हणाली. (ayesha jhulka net worth)

आपल्या एका मुलाखतीत आयशा जुल्काने बॉलिवूडपासून दूर जाण्याचे कारण सांगितलं. ‘व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा त्याला आपल्या जीवनाचा नेमका हेतू कळतो. मला आयुष्यात सेटल व्हायचंहो होतं. त्या काळात मला शूटिंगसाठी बर्‍याच शिफ्टमध्ये काम करावे लागत होतं. मी माझं वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकत्रितपणे सांभाळू शकले नाही, यामुळे मी अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.