AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधींचं ऑफिस घेतल्यानंतर भारती सिंहला आला या गोष्टीचा राग; म्हणाली ‘तोडून टाकेन सगळं..’

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे त्यांच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग्स पोस्ट करत असतात. नुकत्याच एका व्लॉगमध्ये भारतीने तिचं नवीन ऑफिस दाखवलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये ती पती हर्षला थेट इशारासुद्धा देताना दिसतेय.

कोट्यवधींचं ऑफिस घेतल्यानंतर भारती सिंहला आला या गोष्टीचा राग; म्हणाली 'तोडून टाकेन सगळं..'
Bharti Singh and Haarsh LimbachiyaaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 12, 2024 | 1:25 PM
Share

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचा एक युट्यूब चॅनल असून त्यावर ते विविध व्लॉग पोस्ट करत असतात. हर्ष आणि भारती त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अपडेट्स या व्लॉगद्वारे चाहत्यांना देतात. नुकतंच भारतीने एका व्लॉगमध्ये सांगतिलं की तिने नवीन ऑफिस विकत घेतलं आहे. हर्षसोबत ती तिचं नवीन ऑफिस बघायला पोहोचली होती. “ऑफिस खरेदी केल्यानंतर आता पहिल्यांदाच मी बघायला जातेय”, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणते. त्यानंतर ती पती हर्षला एक इशारासुद्धा देते.

“जर मला ऑफिस आवडलं नाही तर मी संपूर्ण ऑफिस तोडून टाकेन. ऑफिसवर बुलडोजर चालवेन आणि त्यानंतर संपूर्ण ऑफिस नव्याने पुन्हा बनवेन”, असा थेट इशाराच ती हर्षला देते. यानंतर व्हिडीओद्वारे ती चाहत्यांना संपूर्ण ऑफिस दाखवते. ऑफिसला पोहोचताच भारतीचा राग पूर्णपणे शांत होतो. “हे ऑफिस ड्युप्लेक्स (दुमजली) असून त्यात बरेच रुम्स आहेत. आमच्या दोघांच्या मेकअप आणि स्टायलिंगसाठी एक खास रुम आहे”, असंही ती सांगते.

हर्ष आणि भारती हे दोघं कॉमेडियन्स असून त्यांनी अनेक शोजचं सूत्रसंचालन केलंय. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये भारती सेकंड रनर अप ठरली होती. त्यानंतर तिने ‘कॉमेडी सर्कस’मध्ये भाग घेतला. भारतीने कृष्णा अभिषेकसोबत मिळून ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. 3 डिसेंबर 2017 रोजी तिने हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं.

पहा व्हिडीओ

भारती आणि हर्षचं ‘LOL (लाइफ ऑफ लिंबाचियास)’ या नावाने युट्यूब चॅनल आहे. त्यावर ते विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. हर्ष आणि भारतीच्या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. या दोघांना एक मुलगा असून तोसुद्धा या व्हिडीओमध्ये दिसून येतो. एप्रिल 2022 मध्ये भारतीने मुलाला जन्म दिला. भारतीकडे जवळपास 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतीचं शूटर बनण्याचं स्वप्न होतं. कॉलेजमध्ये असताना शूटिंगमध्ये तिने सुवर्णपदक मिळवलं होतं. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तिने तिचं स्वप्न सोडून दिलं. भारतीला आता शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी सहा ते सात लाख रुपये मानधन मिळतं.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?