AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीश; निर्मात्यांकडून घेतली मोठी रक्कम

निमृत कौर ही बिग बॉसच्या घरात पोहोचताच कॅप्टन बनली होती. पहिल्या आठवड्यात तिने कमाल केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांकडून तक्रारी येऊ लागल्या की ती कुठेच दिसत नाही. निमृत शोमध्ये फार दिसली असो किंवा नसो मात्र तिने बिग बॉस 16 च्या निर्मात्यांकडून तगडी रक्कम वसूल केली आहे.

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीश; निर्मात्यांकडून घेतली मोठी रक्कम
Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत बनली कोट्यधीशImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई: बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेच्या सहा दिवस आधीच संपूर्ण खेळ पलटला आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रेक्षकांनी सर्वांत कमी मतं देऊन निमृत कौर आहलुवालियाला शोमधून काढून टाकलं आहे. नुकतंच या शोमधून सुंबुल तौकिर खान बाहेर पडली होती. त्यानंतर आता निमृतसुद्धा बाद झाल्याने बिग बॉसच्या खेळीत नवा ट्विस्ट आला आहे. निमृत कौर ही बिग बॉसच्या घरात पोहोचताच कॅप्टन बनली होती. पहिल्या आठवड्यात तिने कमाल केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांकडून तक्रारी येऊ लागल्या की ती कुठेच दिसत नाही. निमृत शोमध्ये फार दिसली असो किंवा नसो मात्र तिने बिग बॉस 16 च्या निर्मात्यांकडून तगडी रक्कम वसूल केली आहे.

बिग बॉसच्या घरात 18 दिवस राहिल्यानंतर निमृत कोट्यधीश झाली आहे. छोट्या पडद्यावरील ‘छोटी सरदारनी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या निमृतने बिग बॉसच्या माध्यमातून दणक्यात कमाई केली आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, निमृत कौर दर आठवड्याला आठ ते नऊ लाखदरम्यान फी स्वीकारत होती. जर सर्वसामान्यपणे साडेआठ लाख रुपये फी घेतली असेल तर 18 आठवड्यांच्या हिशोबाने ही रक्कम 1 कोटी 53 लाखांच्या घरात पोहोचते. बिग बॉसचा शो जेव्हा सुरू झाला होता तेव्हा घरात सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक सुंबुल तौकिर खान होती. ती दर आठवड्याला 11 लाख रुपये मानधन घ्यायची. मात्र शोमधील तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर निर्मात्यांची तिची फी कमी केली.

बिग बॉस 16 मुळे निमृतला फक्त पैशांचाच फायदा झाला नाही तर तिला दिबाकर बॅनर्जी आणि एकता कपूर यांच्या ‘एलएसडी 2’ या चित्रपटात मुख्य भूमिकासुद्धा मिळाली. छोटी सरदारनी या मालिकेत निमृतने भूमिका साकारली होती. मात्र बिग बॉस 16 मध्ये आल्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

बिग बॉसच्या घरातून निमृत कौर आहलुवालिया बाहेर पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. मात्र निमृत गेल्यानंतर घरात शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक राहणार आहेत.

बिग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेती रुबिना दिलैकला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की यंदाच्या सिझनची ट्रॉफी कोणता स्पर्धक पटकावू शकतो? त्यावर तिने प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये तगडी चुरस रंगणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर बिग बॉसची 15 व्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाशनेसुद्धा तिचं मत मांडलं आहे. तेजस्वीनेही प्रियांका चहर चौधरीचं नाव घेतलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चौदाव्या आणि पंधराव्या सिझनच्या विजेत्यांनी त्यांच्या मुलाखतीतून मोठी हिंट दिल्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.