AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बिग बॉस’चा विजेताच म्हणतोय ‘पुन्हा ते घर नको रे बाबा!’, जाणून घ्या नेमकं कारण काय?

‘बिग बॉस 8’चा विजेता असलेला अभिनेता गौतम गुलाटी (Gautam gulati) या दिवसांमध्ये बराच चर्चेत आला आहे. अलीकडेच तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटामध्ये दिसला आहे.

‘बिग बॉस’चा विजेताच म्हणतोय ‘पुन्हा ते घर नको रे बाबा!’, जाणून घ्या नेमकं कारण काय?
गौतम गुलाटी
| Updated on: May 20, 2021 | 2:35 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस 8’चा विजेता असलेला अभिनेता गौतम गुलाटी (Gautam gulati) या दिवसांमध्ये बराच चर्चेत आला आहे. अलीकडेच तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटामध्ये दिसला आहे. या चित्रपटात गौतम एका ‘गिरगीट’चे पात्र साकारले होते. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसे, बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर गौतमला जबरदस्त लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर त्याची फॅन फॉलोइंगही लक्षणीय वाढली आहे. गेल्या पर्वात म्हणजेच ‘बिग बॉस 14’मध्ये गौतमला हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यासोबत ‘तुफानी सिनियर’ म्हणून घरात प्रवेश करण्याची ऑफरही देण्यात आली होती, परंतु त्याने नकार दिला होता. आता गौतमने स्वत: याचे कारण सांगितले आहे (Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again).

झूमला दिलेल्या मुलाखतीत गौतमने सांगितले की, तो ‘बिग बॉस’च्या घरात आत जाणार नाही, कधीतरी पाहुणा म्हणून शोमध्ये जाईल. तो म्हणाला, ‘मी या शोचा एक भाग होतो याचा मला खूप आनंद आहे आणि लोक अजूनही माझी आठवण काढतात. मात्र, आता मी पुन्हा त्या शोमध्ये जाणार नाही, जर एखादे काम किंवा थीमनुसार पाहुणा म्हणून बोलावलं तर नक्की विचार करेन.’

गौतम म्हणाला की, तो आता कार्यक्रमात जाण्याच्या नियमांचे पालन करू शकणार नाही. कारण त्यानंतर त्याचे इतर उर्वरित प्रकल्प ठप्प होतील. मागील वर्षी, त्याला 2 आठवड्यांपर्यंत घरात राहण्यासाठी ऑफर करण्यात आली होती. परंतु, कोरोनामुळे त्याला 14 दिवस अलगीकरणात राहून आणि नंतर शोमध्ये गेल्यानंतर तो कालावधी इतका वेळ द्यावा लागणार होता. तो म्हणतो, माझ्याकडे तितका वेळ नव्हता कारण मी शूटिंग करत होतो आणि मी ज्या प्रकल्पांवर काम करत होतो, त्यांना गमावू इच्छित नव्हतो (Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again).

कसा मिळाला ‘राधे’मध्ये रोल

‘गिरगिट’ची भूमिका त्याच्याकडे कशी आली, हे सांगताना गौतम म्हणतो, “सलमान सर नसते तर हे शक्य झाले नसते.” आम्ही एक दिवस अचानक भेटलो आणि त्यांनी मला मिठी मारली. त्यावेळी त्यांना वाटले की आपण एकत्र काम केले पाहिजे. जेव्हा त्यांनी मला विचारले की, आपण एखादे नकारात्मक पात्र साकारण्यास इच्छुक आहात का, हे ऐकल्यावर मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी त्यांना सांगितले की माझे सर्व आवडते नायकही खलनायक आहेत आणि दुसर्‍याच दिवशी त्यांच्या टीमने मला बोलावले आणि मला या भूमिकेसाठी निवडले गेले. माझे कपडे, लूक, प्रशिक्षण या सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरू झाल्या आणि केशरचना बदलून थेट शूटिंग सुरू झाली. जेव्हा एखादा टॉप मेगास्टार आपल्या मदतीसाठी पुढे येतो आणि आपल्यावर विश्वास ठेवतो तेव्हा खूप अभिमान वाटतो.’

गौतमची भूमिका वाढवण्यात आली

गौतम म्हणाला, ‘काही सीन पाहिल्यानंतर माझे पात्र आणखी वाढवण्यात आले. मी शूटिंग संपवून घरी परत आलो आणि 10 दिवसांनी मला पुन्हा अधिक शूट करण्यासाठी बोलवले गेले, कारण सरांना वाटले की मी हे अधिक चांगले करू शकेन आणि ही माझी सर्वात मोठी कामगिरी आहे आणि त्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे.’

(Bigg Boss 8 winner Gautam gulati said he will not enter in bigg boss again)

हेही वाचा :

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

RRR | ज्युनिअर एनटीआरचे बर्थडे सरप्राईज, पाहा ‘कोमाराम भीम’चा नवा जबरदस्त लूक

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.