AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत

'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी राजे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. पण भाजपच्या एका नेत्याने यावर खंत व्यक्त केली आहे.

'छावा' सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
ChhaavaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2025 | 12:49 PM
Share

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा विशेष गाजला. संपूर्ण देशात सिनेमाने तुफान कमाई केली. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. आता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात छावा सिनेमामुळे इतिहास समजायला लागला याचे मला दु:ख होते असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, ‘छावा सिनेमामुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या पिढीला सिनेमामधून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत.’ वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

पुढे शिवेंद्रराजे यांनी टीका करत म्हटले, ‘आज या महाराष्ट्राची धुरा एक जानता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. असे नेते महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यात हवे आहेत. त्याचे नेतृत्व राज्याचे आहे आणि आत्तापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते.’

महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो. हे कार्य आपणाला करायचे आहे. प्रायव्हसी हा विषय फार घातक आहे. आपण जे बोलतो ते मोबाईलमध्ये सेव होते. कायदा कडक झाला पाहिजे. कोण कुठेही बसून काही टाकू शकतो. समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतो. कारक कोणीही काहीही टाकतो असे ते पुढे म्हणाले.

छावा सिनेमाविषयी

छावा हा सिनेमा मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संभाजीची भूमिका विक्की कौशलने साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.