AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत

'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी राजे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. पण भाजपच्या एका नेत्याने यावर खंत व्यक्त केली आहे.

'छावा' सिनेमामुळे इतिहास कळाला हे दुर्दैव; भाजप नेत्याने व्यक्त केली खंत
ChhaavaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2025 | 12:49 PM
Share

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा सिनेमा विशेष गाजला. संपूर्ण देशात सिनेमाने तुफान कमाई केली. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. आता भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत बोलताना खंत व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात छावा सिनेमामुळे इतिहास समजायला लागला याचे मला दु:ख होते असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, ‘छावा सिनेमामुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या पिढीला सिनेमामधून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. ते आत्ताच्या पिढीला माहीत नाहीत.’ वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

पुढे शिवेंद्रराजे यांनी टीका करत म्हटले, ‘आज या महाराष्ट्राची धुरा एक जानता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. असे नेते महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यात हवे आहेत. त्याचे नेतृत्व राज्याचे आहे आणि आत्तापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते.’

महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आपण म्हणतो. हे कार्य आपणाला करायचे आहे. प्रायव्हसी हा विषय फार घातक आहे. आपण जे बोलतो ते मोबाईलमध्ये सेव होते. कायदा कडक झाला पाहिजे. कोण कुठेही बसून काही टाकू शकतो. समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतो. कारक कोणीही काहीही टाकतो असे ते पुढे म्हणाले.

छावा सिनेमाविषयी

छावा हा सिनेमा मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात संभाजीची भूमिका विक्की कौशलने साकारली होती आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.