AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birth Anniversary  | पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले केवळ 750 रुपये, अभिनयाच्या जोरावर पटकावला ‘राष्ट्रीय पुरस्कार’, वाचा फारुख शेख यांच्याबद्दल…

फारुख यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे, परंतु अभिनय क्षेत्रात येणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न होते. चला तर, जाणून घेऊया फारुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

Birth Anniversary  | पहिल्या चित्रपटासाठी मिळालेले केवळ 750 रुपये, अभिनयाच्या जोरावर पटकावला ‘राष्ट्रीय पुरस्कार’, वाचा फारुख शेख यांच्याबद्दल...
फारुख शेख
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Mar 25, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते फारुख शेख (Farooq Shaikh) यांचा आज वाढदिवस आहे. फारुख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी झाला होता. आज फारुख यांचा 73वा वाढदिवस आहे. 1977पासून ते 1989पर्यंत या अभिनेत्याने पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. फारुख यांनी आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे चाहत्यांना नेहमी वेड लावले. मोठ्या पडद्यानंतर अभिनेत्याने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. फारुखच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी वकील व्हावे, परंतु अभिनय क्षेत्रात येणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न होते. चला तर, जाणून घेऊया फारुख यांच्याबद्दल काही खास गोष्टी…(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special)

पहिल्या चित्रपटातून ‘इतकी’ कमाई

कॉलेजच्या काळापासून फारुख शेख थिएटरमध्ये दाखल झाले होते. थिएटरमधील त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे त्यांना 1973मध्ये रिलीज झालेल्या ‘गर्म हवा’ चित्रपटात ब्रेक मिळाला. फारुख यांना या चित्रपटासाठी केवळ 750 रुपये इतकेच मानधन मिळाले होते. बराच काळ फारुख चांगल्या कामासाठी संघर्ष करत राहिले.

नशीब बदलेले!

निर्माता-दिग्दर्शक यश चोप्राच्या 1979मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नूरी’ या चित्रपटाने फारूख शेख यांचे भविष्य बदलले. या चित्रपटाने फारुखला एक नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 1981मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’ या चित्रपटाने त्यांची कारकीर्द बदलली. आजपर्यंत चित्रपटात फारुख यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहते अजूनही विसरलेले नाहीत.

फारुख यांनी चित्रपटात तसेच व्यावसायिक चित्रपटातही एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘कथा’, ‘बाजार’, ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘क्लब 60’ आणि इतर बऱ्याचशा चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. फारुख शेख यांनी सत्यजित रे, ऋषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले (Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special).

दीप्ती नवलसह जमली जोडी

फारुख शेखसोबत दीप्ती नवलची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीचा जवळपास प्रत्येक चित्रपट पडद्यावर यशस्वी झाला. फारुख शेख यांनी दीप्ती नवलबरोबर ‘चश्म-ए-बद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’, ‘किसी से ना कहना’, ‘रंग बिरंगी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

वर्षानुवर्षे अभिनय केल्यावर, 2010मध्ये ‘लाहोर’ मधील अभिनयासाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2014 मध्ये रिलीज झालेला ‘यंगिस्तान’ हा फारुख शेख यांचा अखेरचा चित्रपट होता. 28 डिसेंबर 2013 रोजी, फारुख शेख यांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे या जगाचा  निरोप घेतला.

(Bollywood Actor Farooq Shaikh Birth Anniversary  special)

हेही वाचा :

अबब ! शनाया कपूरने एवढ्या महाग बिकिनीवर केले फोटोशूट, किंमत तब्बल….

Malaika Arora : मलायचा अरोराकडून शिका प्लँक्सची मजेशिर पद्धत, व्हिडीओ व्हायरल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली