अहंकारी सत्ता कोसळणार…, देशातील आजची परिस्थिती सांगत बड्या अभिनेत्याचं भाकित
देशात सध्या सर्वत्र आंदोलनांचं सत्र सुरु असताना दिसत आहे. अशात मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी देखील पुढे येत स्वतःचं मत मांडत सरकारवर निशाणा साधत आहेत. अता देखील देशातील आजच्या परिस्थितीवर बड्या अभिनेत्याने भाकित करत 'अहंकारी सत्ता कोसळणार...', अशी पोस्ट केली आहे.

देशातील तरुण आता त्यांच्या हक्कांसाठी पुढे येताना दिसत आहे. CJP च्या आंदोलनानंतर झारखंडमध्ये देखील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. सोमवार, 10 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध बळाचा वापर करण्यात आला. या घटनेवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर विधानसभेबाहेर लाठीचार्ज करण्यात आला. तीनवेळा त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. तरी देखील JPSC-JSSC चे उमेदवार मागे हटले नाहीत.
अभिनेते प्रकाश राज यांनी आंदोलनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत आहे तर, त्यांच्यावर टियर गॅसने त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे… ही परिस्थिती पाहता व्हिडीओ पोस्ट करत प्रकाश राज म्हणाले, ‘का… का… का…! हे रानटी कृत्यआता चालणार नाही, यामुळे ही अहंकारी सत्ता कोसळणार…’, सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
Why .. Why .. Why 💔💔💔 . This brutality will not work anymore.. it will only bring the arrogant power down . #justasking https://t.co/wFBXcvUfdp
— Prakash Raj (@prakashraaj) August 10, 2026
आंदोलक आणि पोलिसांमधील संघर्ष
आंदोलकांनी स्पर्धा परीक्षेतील कथिक घोटाळ्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याची ठाम भूमिका घेतली आहे असून CBI चौकशीची मागणी केली आहे. जेव्हा विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले तेव्ही पोलिसांकडून मोठी करावाई करत, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आंदोलन करण्याचं कारण काय?
झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग (JSSC) यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांविरोधात ‘JPSC-JSSC सुधार मंच’ने हे आंदोलन आयोजित केलं. आंदोलकांनी पोलिसांच्या कठोर कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला. गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी सांगितल्यानुसार, हे आंदोलन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करतं.