AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | ‘ते महान असतील पण मी…’, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असं का म्हणाला किंग खान?

महानायक अभिताभ बच्चन यांच्याबद्दल शाहरुख खान याचं मोठं वक्तव्य; बिग बींना किंग खान असं काय म्हणाला ज्यामुळे अभिनेत्याला सर्वांसमोर मागावी लागली माफी!

Shah Rukh Khan | 'ते महान असतील पण मी...', अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असं का म्हणाला किंग खान?
| Updated on: May 01, 2023 | 10:29 AM
Share

मुंबई : बॉलिवूड विश्वातील सेलिब्रिटींबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं नाव अव्वल स्थानी येतं. एवढंच नाही तर, दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शिवाय शाहरुख आणि अमिताभ बच्चन या सुपरस्टार्सचं नातं देखील फार घट्ट आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. पण एक काळ मोठा पडदा गाजवलेल्या अभिनेताभ बच्चन यांना शाहरुख असं काही म्हणाला, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण या प्रकरणानंतर शाहरुख याने ऑन कॅमेरा सर्वांसमोर बिगी बींची माफी देखील मागितली.

शाहरुख खान कायम त्याच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. झगमगत्या विश्वातून शाहरुख खान याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. दरम्यान, शाहरुख खान याने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा किंग खानने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. कार्यक्रमात अभिनेत्याला बिग बी यांच्या महानतेबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा शाहरुख खान म्हणाला, ‘ते महान असतील पण मी त्यांच्यापेक्षा अधिक महान आहे…’

अनेक वर्षांनंतर जेव्हा शाहरुख ‘फॅन’ सिनेमाचं प्रमोशन करत होता. तेव्हा अभिनेत्याला बिग बी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा किंग खान म्हणाला, ‘लहान होतो तेव्हा आणि लहानपणी अशा गोष्टी कोणीही करतं. लहान मुलगा समजून माफ करा. मी सर्वांना सांगेल स्वतःवर विश्वास ठेवा. पण तरुण वयात थोडा जास्त आत्मविश्वास असतो… ज्यामुळे प्रत्येक जण चुकी करतं…’ असं किंग खान म्हणाला.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला. बिग बी अपघातानंतर त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.

‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाने फक्त देशातच नाही तर, संपूर्ण जगात अनेक विक्रम मोडले. त्यामुळे किंग खान याचा आगामी सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.