AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिची साखरपुड्यातील अंगठी कुठे?, अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करत नाहीये.

ऐश्वर्या राय हिची साखरपुड्यातील अंगठी कुठे?, अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच...
Aishwarya Rai
| Updated on: Aug 15, 2024 | 12:27 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ऐश्वर्या राय दिसते. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन याच्यासोबतच्या लग्नानंतरही ऐश्वर्या राय ही चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसली. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अत्यंत खास पद्धतीने लग्न केले. काही वर्ष डेट केल्यानंतर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची पहिली भेट ही चित्रपटाच्या सेटवर झाली. अगोदर दोघे मित्र चांगले होते आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. त्याची अनेक कारणे देखील आहेत. मुळात म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय ही तिच्या मुलीसोबत पोहोचली होती. बच्चन कुटुंबासोबत लग्नात येणे तिने टाळले. बाकी सर्व बच्चन कुटुंबिय एकत्रच आले. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन यानेही एक घटस्फोटाची पोस्ट लाईक केली.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत नाहीये. घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यापासून ऐश्वर्या राय हिने तिची अंगठी घालणे बंद केले. एक काळ असा होता की, ऐश्वर्या राय ही आपल्या साखरपुड्याची अंगठी कधीच काढत नव्हती. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिची साखरपुड्याची अंगठी अशी तशी नसून खूप महत्वपूर्ण आहे.

ऐश्वर्या राय हिच्या साखरपुड्याची अंगठी व्ही आकाराची आहे. ही अंगठी नाग राजवंशाचे वंशज आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ही अंगठी नागवंशातील लोक किंवा नागदेवतेची पूजा करणारे लोक घालतात आणि ही अंगठी विशेषतः विवाहित महिला घालतात. अविवाहित मुली ही अंगठी घालू शकत नाहीत. ऐश्वर्या राय हिच्या साखरपुड्याच्या अंगठीचे खूप महत्व आहे. 

ऐश्वर्या राय हिच्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठी दिसणे बंद झाल्यापासूनच विविध चर्चा रंगताना दिसल्या. दुसरीकडे अभिषेक बच्चन हा देखील साखरपुड्याच्या अंगठी घालताना दिसत नाहीये. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य करताना दिसत नाहीये. खरोखर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोटा होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.