AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्हइन रिलेशन, प्रेग्नेंसी, हृदयद्रावक निधनानंतर…

Love Life | वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास... तिने विवाहित अभिनेत्यावर प्रेम केलं, त्याच्या मुलाला जन्म देखील दिला, पण नाही अनुभवता आलं मातृत्व... ८०, ९० च्या दशकात समाजाची पर्वा न करता तिने फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं..

Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्हइन रिलेशन, प्रेग्नेंसी, हृदयद्रावक निधनानंतर...
| Updated on: Oct 16, 2023 | 2:13 PM
Share

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कुटुंबियांची, मित्र-परिवाराची, समाजाची पर्वा न करता फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं. ८०, ९० च्या दशकात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री स्वतःच्या अटी शर्थींवर जगल्या. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी होती जिचं विवाहित अभिनेत्यावर जीव जडला. सिनेमाच्या सेटवर झालेल्या पहिल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे दोघांनाच्या नात्याला अनेकांनी विरोध केला. अखेर दोघांनी ८०, ९० च्या दशकातलिवइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने प्रियकराच्या मुलाला जन्म देखील दिला…

खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहीली. ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्यामुळे अभिनेत्रीला आपले प्राण गमवावे लागले. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलिवूडच्या ‘लेडी सुपरस्टार’ला चाहते विसरू शकले नाहीत. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्मिता पाटील आहे.

स्मिता पाटील हिचं नाव बॉलीवूडच्या सशक्त अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. स्मिता पाटील यांनी महिलांवर आधारित अनेक सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलके’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राज आणि स्मिता एकमेकांच्या फार जवळ आहे. त्यांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते.

विवाहित राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. अनेकांना दोघांच्या नात्याला विरोध देखील केला. त्यानंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. पण डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे स्मिता पाटील यांचं हृदयद्रावक निधन झालं..

वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरच्या श्वास घेतला. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक बब्बर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच प्रतीकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव बदलल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर.. असं नाव असल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर देखील त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.