AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twinkle Khanna : पुस्तकातील मुघलांना हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा; ट्विंकल खन्नाच्या पोस्टमुळे नवा वाद

Twinkle Khanna : अभिनेत्री लेखिका ट्विंकल खन्नाने तिच्या एका पोस्टमध्ये मुघलांबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद पेटला आहे. आता ट्विंकल नेमकं काय म्हणाली? वाचा...

Twinkle Khanna : पुस्तकातील मुघलांना हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा; ट्विंकल खन्नाच्या पोस्टमुळे नवा वाद
Twinkle KhannaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 9:12 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने केलेल्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ट्विंकलने ‘मिसेस फनीबोन्स’ या तिच्या कॉलममध्ये अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. ट्विंकलने या कॉलमध्ये मुघलांचा इतिहास पुस्तकातून हटवण्यापेक्षा जेवणातील कबाब हटवा असे विधान केले आहे. तिच्या या विधानाने नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

काय म्हणाली ट्विंकल खन्ना?

खरे तर ट्विंकल खन्नाने तिच्या कॉलममध्ये मुघल साम्राज्याबाबत लिहिले होते की, जे लोक आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांना हटवू टाकू इच्छितात, त्यांनी सर्वप्रथम त्याची सुरुवात लंचपासून करावी. आधी कोफ्ते, कोरमा, कबाब यांचा त्याग करावा… तुम्ही खरे आहात की खोटे, मुघलाई पनीरही ठेवू शकत नाही आणि ते खाऊही शकत नाही. सोशल मीडियावर ट्विंकल खन्नाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ट्विंकलच्या या विधानाने इंटरनेटवरील एका कंटेंट क्रिएटर शीमा खेर यांना राग अनावर झाल आहे. केवळ शीमाच नव्हे तर अनेक इतर युजर्सनीही अभिनेत्रीच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.

शीमा यांनी ट्विंकल खन्नावर टीका केल्याचे दिसत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जेवणाची तुलना हिंसक इतिहासाशी करणे हे ना मजेदार आहे ना शहाणपणाचे. पुढे त्यांनी ‘केसरी’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. हा चित्रपट ट्विंकलचा पती अक्षय कुमारनेच केला आहे.

इंटरनेटवर प्रश्न उपस्थित होत आहेत

शीमा म्हणाल्या की, सारागढीच्या लढाईसारख्या ऐतिहासिक घटना शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट नसल्याने ‘केसरी’सारखे चित्रपट बनवले गेले. तिने मिश्किलपणे म्हटले की, जर ट्विंकलला चित्रपट पाहिल्यानंतर त्या काळातील हिंसाचार समजला आणि तो तिला आवडला, तर याचा अर्थ असा नाही की ती त्यानंतर चिकन किंवा इतर पदार्थ खाणे सोडून देईल.

त्या ट्विंकलला प्रश्न विचारतात की, जर आपण इतिहासातील हिंसा आणि संघर्षावर आधारित चित्रपट पाहू शकतो, तर शहीदांच्या पराक्रमाचा स्वीकार करू शकतो आणि तरीही जेवण खाऊ शकतो. इतिहासाच्या चर्चेत अचानक जेवणाचा वापर युक्तिवाद म्हणून का केला जात आहे? शेवटी शीमा म्हणाल्या की, मुघल भारतात फक्त कबाब आणि कोरमासारख्या गोष्टी देण्यासाठी आले नव्हते. त्यांच्या काळात युद्धे, विजय आणि रक्तपातही झाला होता. त्यामुळे इतिहासाला फक्त जेवणाच्या दृष्टिकोनातून पाहू नये.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली