Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा… आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार…
बॉलिवूड अभिनेता आमिर खान 5 जुलै रोजी गौरी स्प्रैटसोबत तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. बांद्र्यातील त्याच्या घरीच हा छोटेखानी सोहळा होणार असून, केवळ 150 वऱ्हाडी उपस्थित राहतील, ज्यात परदेशी पाहुणे आणि माजी पत्नी व मुलांचाही समावेश आहे. आमिरने सर्वांचे आशीर्वाद मागितले आहेत.

भारती दुबे, प्रतिधिनिधी, Aamir Khan And Gauri Spratt Wedding Details : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खान गौरी स्प्रैट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आमिरने गेल्या महिन्यात स्वत: गौरीशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण लग्न कधी होणार याची तारीख ठरलेली नव्हती. आता तारीखही समोर आली आहे. त्यामुळे आमिरच्या तिसऱ्या लग्नाकडे बॉलिवूडच नव्हे तर त्याच्या चाहत्याचीही नजर लागली आहे.
टीव्ही9ला आमिरच्या लग्नाची बित्तंबातमी मिळाली आहे. आमिरचं लग्न कोणत्याही पॅलेसमध्ये, पंचतारांकित हॉटेलात किंवा लॉनवर होणार नाहीये. तर बांद्रा येथील आपल्या राहत्या घरीच आमिर विवाहबद्ध होणार आहे. आमिरच्या लग्नाला फक्त 150 वऱ्हाडी असणार आहेत. यातील बहुतेक पाहुणे हे आमिरचे नातेवाईक असणार आहे. तर काही पाहुणे विदेशातून येणार आहेत. काही खास आणि जवळची मित्रमंडळीही लग्नाला हजर राहणार आहे. विशेष म्हणजे आमिरच्या आधीच्या दोन बायका आणि त्यांची मुलंही या लग्नात दणक्यात सहभाग घेणार आहेत.
आमच्यासााठी…
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान 5 जुलै रोजी दुपारच्या आधीच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आमिरने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने त्याच्या लग्नावर भाष्य केलं होतं. पाच जुलै रोजी लग्न होत आहे. अत्यंत छोटा सोहळा असणार आहे. घरीच लग्न सोहळा उरकणार आहोत. 5 जुलै हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी. फक्त दोन परिवार सामिल होणार आहे. काही दोस्त मंडळी येणार आहेत. आम्हाला लोकांचा आशीर्वाद हवा आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही आनंदी राहावं आणि आमचं वैवाहिक आयुष्य सुखी जावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा, असं आमिर या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.
तिसरं लग्न…
हे आमिर खानचं तिसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न रिना दत्ताशी 1986मध्ये झालं होतं. 2002मध्ये दोघांचा तलाक झाला. 2005मध्ये आमिर खानने किरण रावसोबत लग्न केलं. 2021मध्ये दोघे वेगळे झाले. दोन्ही बायकांशी तलाक होऊनही त्याचे दोघींशी चांगले संबंध आहेत. आमिरचं हे तिसरं लग्न असलं तरी गौरीचंही हे दुसरं लग्न आहे. गौरीला एक सात वर्षाचा मुलगा आहे. आमिर खानलाही तीन मुलं आहे. पहिल्या बायकोकडून जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले तर दुसऱ्या बायकोकडून आजाद हा मुलगा आहे.