AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn: “माझ्याही संसारात चढउतार आहेत, मतभेद आहेत, पण..”; काजोलबाबत व्यक्त झाला अजय देवगण

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परस्परविरोधी स्वभाव असणाऱ्या या दोघांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. 1995 मध्ये 'हलचल' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

Ajay Devgn: माझ्याही संसारात चढउतार आहेत, मतभेद आहेत, पण..; काजोलबाबत व्यक्त झाला अजय देवगण
Ajay Devgn and KajolImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2022 | 9:36 AM
Share

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परस्परविरोधी स्वभाव असणाऱ्या या दोघांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. 1995 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले होते. आजपर्यंत या दोघांनी ‘इश्क’, ‘दिल क्या करे’, ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘गुंडाराज’, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. 2003 मध्ये काजोलने न्यासाला तर 2010 मध्ये युगला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजय त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल (marriage) व्यक्त झाला. संसारात अनेकदा चढउतार आल्याची कबुली त्याने यावेळी दिली.

रणवीर अलाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत अजय म्हणाला, “आमचं लग्न खूप चांगल्याप्रकारे टिकून राहिलंय. पण आमच्याही संसारात चढउतार आहेत. मतभेद आहेत, पण तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे, कारण सर्वांची मनं एकसारखी नसतात. मुलांचाही विचार करावा लागतो. दोन डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करतात. पण काय योग्य आणि काय अयोग्य आहे याचा विचार करून त्यानुसार निर्णय घेता येतात. तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, हेसुद्धा समजून घ्यावं लागतं. यात सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या चुका खुल्या मनाने स्वीकारायला शिका. जिथे तुम्ही चुकता तिथे माफी मागून पुढे निघून जा. तुम्ही अहंकाराला जपलात तर काही गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत.”

“मला लोकांची खूप काळजी असते. पण ही काळजी दाखवण्याचा माझा वेगळा मार्ग आहे. मी सतत ते तुम्हाला समोर बोलून दाखवू शकत नाही. प्रेम हे भागीदारी, जबाबदारी आणि काळजीमध्ये रूपांतरित जेव्हा होते, तेव्हा ते प्रेमापेक्षा अधिक मजबूत असते. कारण केवळ प्रेम तुम्हाला जगायला शिकवू शकत नाही”, असंही तो पुढे म्हणाला.

अजयने 1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा ‘रनवे 34’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह, अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...