कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते.

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 12:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. आलिया नेहमीच रणबीर चांगला मित्र असल्याचे सांगते.  मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे.  रणबीरने नुकतीच राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत आपली गर्लफ्रेंड आलियाबद्दल सांगितले आणि ऐवढेच नाहीतर लग्न कधी करणार आहे याबद्दल देखील रणबीरने सांगितले आहे. (Alia Bhatt and I would have been married Ranbir Kapoor)

रणबीरने मुलाखतीत सांगितले की, दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर रणबीर चित्रपट आणि मालिका बघायचा, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती. रणबीरने लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला हे सांगितले. तो म्हणाला की, सुरुवातीला आम्ही कौटुंबिक त्रासातून जात होतो. त्यानंतर, मी पुस्तके वाचण्यास आणि कुटुंबासमवेत वेळ घालवू लागलो आणि दिवसातून 2-3 चित्रपट बघायचो. आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतो की, हा कोरोना व्हायरल आला नसता तर कदाचित आम्ही आतापर्यंत लग्न देखील केले असते.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

(Alia Bhatt and I would have been married Ranbir Kapoor)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.