AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी

एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने रिनासोबत घटस्फोट, त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध याबाबतची माहिती दिली होती. (Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta know Relationship)

रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी
aamir khan reena dutta
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान-किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे. (Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta love story)

लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी घटस्फोट

आमिर खानला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शन्सिट या नावाने ओळखले जाते. आमिर खान कामाच्या बाबत जरी परफेक्ट असला, तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक उतार चढाव आले आहेत. आमिर खानच्या करिअरच्या सुरुवातीला वयाच्या 21 व्या वाढदिवसाला रीना दत्ता हिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये त्या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता.

रिना दत्तासोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिर खान हा फार अस्वस्थ होता. एका इंटरव्ह्यूमध्ये आमिरने रिनासोबत घटस्फोट, त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध याबाबतची माहिती दिली होती. रिना आणि मी फार तरुण वयात एकमेकांसोबत लग्न केले. ते 16 वर्ष एकत्र होते. ज्यावेळी त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या दोघांसोबतच कुटुंबालाही धक्का बसला. त्याला यातून बाहेर पडण्यासाठी दोन वर्ष लागले.

“रिनाने तिच्या आयुष्याची बरीच वर्षे त्यांच्याबरोबर घालविली आणि मला आयुष्याचा भाग होण्याची संधी दिली, याबद्दल मी तिचे आभारी आहे. रिना खूप खास आहे आणि त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे आणि नेहमीच राहिल.” असे आमिर खान म्हणाला होता.

आमिर आणि रिनाची लव्हस्टोरी

आमिर आणि रिनाच्या घराच्या खिडक्या एकमेकांच्या समोरासमोर होत्या. ते दोघं नेहमीच एकमेकांना पाहात असायचे. आमिर हा रिनाच्या प्रेमात पडला होता. त्याने तिला प्रपोजही केले होतं. मात्र रिनाने नेहमीच त्याला नकार दिला. विशेष म्हणजे आमिरने रिनाला एकदा रक्ताने पत्रही लिहिलं होतं. मात्र त्यानंतरही रिनाने त्याचे न ऐकताच तू असं करु नकोस असे सांगितले.

यानंतर आमिरने तिच्या मागे मागे करणं बंद केले. पण यानंतर रिना आमिरच्या प्रेमात पडली. आमिर खानच्या 21 व्या वाढदिवसाला रजिस्ट्रार ऑफिसला घरातून पळून जाऊन लग्न केले होतं. आमिर खानला पहिली पत्नी रिया दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत.

लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये ते दोघं वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट का घेतला, त्याचे नेमके कारण काय? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर ते एकमेकांविषयी काहीही बोलले नाहीत. “कायदेशीररित्या आम्ही वेगळे झालो असलो तरी एक कागदाचा तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नाही,” असे आमिर घटस्फोटानंतर म्हणाले होता. या घटस्फोटानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.

(Bollywood Actor Aamir Khan first Divorce And Relation With Ex Wife Reena Dutta love story)

संबंधित बातम्या : 

Amir Khan Kiran Rao Divorce | अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट, किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

Aamir Khan Kiran Rao Divorce | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमिर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.