Akshay Kumar | सततच्या फ्लाॅप चित्रपटांनंतर अक्षय कुमारने घेतला अत्यंत मोठा निर्णय
एकाच वर्षात अक्षय कुमारचे तब्बल तीन ते चार चित्रपट रिलीज होतात. यामुळे अक्षय कुमारवर टिकाही करतात.
मुंबई : अक्षय कुमार हा बाॅलिवूडमधील असा एक अभिनेता आहे की, तो एकाच वर्षी तीन ते चार चित्रपटांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एकाच वर्षात अक्षय कुमारचे तब्बल तीन ते चार चित्रपट रिलीज होतात. अक्षय हा सतत काम करतो. मात्र, काहीजण यामुळे अक्षय कुमारवर टिकाही करतात. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून हीट चित्रपट देणारा अभिनेता अक्षय कुमारचे गेल्या दोन वर्षांपासून चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेले ‘रक्षाबंधन’ आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ हे तर बाॅक्स ऑफिसवर चित्रपटाचे बजेट काढण्यातही यशस्वी ठरले नाहीत.
सततच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांमुळे अनेकांनी अक्षय कुमारवर निशाना देखील साधला. इतकेच नाही तर काहींनी वेगवेगळ्या पध्दतीने अक्षयला टार्गेट करण्यास सुरूवात केली. यावर बोलताना अक्षय म्हणाला की, मी सकाळी का लवकर उठतो, रात्री का लवकर झोपतो, मी वर्षभरात इतक्या जास्त चित्रपटात का काम करतो हे सर्व प्रश्न मला सातत्याने विचारले जात आहेत. कोणी असा माणूस मला सांगा की, ज्याला चांगल्या संधी मिळत आहेत. पण तो काम करणार नाही.
जर तुम्हाला चांगल्या संधी मिळत असतील तर कोणीच काम करणे सोडणार नाही. हा पण मला काही बदल करायचे आहेत, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. कोरोनानंतर सर्वकाही बदलले आहे, प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवली आहे. परंतू यामध्ये प्रेक्षकांची अजिबातच चूक नाहीये. प्रेक्षकांना चित्रपटाशी कसे जोडून ठेवता येईल, यावर मला काम करायचे आहे. पुढे अक्षय कुमार म्हणाला की, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे कोरोनानंतर खरोखरच काही गोष्टी बदलल्या आहेत. यामुळेच मी माझी फीस कमी करण्याचा विचार करतोय.