AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Prasoon Joshi | ‘माँ’पासून ते ‘हम तुम’पर्यंत, प्रसून जोशींच्या लेखणीतून उतरलेली ‘ही’ गाणी श्रोत्यांच्या कानाला करतात तृप्त!

गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. ते एक उत्तम लेखक, कवी, पटकथाकार तसेच गीतकार आहेत. कलेवरचे त्यांचे प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. त्यांच्या कामाचे भारतात तसेच, परदेशातही कौतुक होत आहे.

Happy Birthday Prasoon Joshi | ‘माँ’पासून ते ‘हम तुम’पर्यंत, प्रसून जोशींच्या लेखणीतून उतरलेली ‘ही’ गाणी श्रोत्यांच्या कानाला करतात तृप्त!
Prasoon Joshi
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. ते एक उत्तम लेखक, कवी, पटकथाकार तसेच गीतकार आहेत. कलेवरचे त्यांचे प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. त्यांच्या कामाचे भारतात तसेच, परदेशातही कौतुक होत आहे. प्रसून जोशी आज आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1971 रोजी उत्तराखंडमध्ये झाला. प्रसून यांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिले पुस्तक लिहिले.

प्रसून यांनी 2001 मध्ये ‘लज्जा’ या चित्रपटातून गीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना लवकरच खूप प्रसिद्धी मिळाली. प्रसून जोशी यांनी अनेक चित्रपटांचे संवाद लिहिले आहेत, यासोबतच त्यांनी अनेक गाण्यांचे बोल लिहिले, जे सुपरहिट ठरले.

आज (16 सप्टेंबर), प्रसून जोशीच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी श्रोत्यांचे कान तृप्त झाले…

चांद सिफारिश

आमिर खान आणि काजोलचा ‘फना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या कथेबरोबरच त्याचे संगीतही खूप पसंत केले गेले. या चित्रपटाचे गाणे ‘चांद सिफारिश’ प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. या गाण्यासाठी प्रसून यांना सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

हम तुम

राणी मुखर्जी आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘हम तुम’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील सर्व गाण्यांचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

मां

‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘माँ’ हे गाणे प्रत्येकाला भावनिक बनवते. या गाण्याने करोडो लोकांच्या हृदयांना स्पर्श केला आहे. या गाण्यासाठी प्रसून जोशींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

भाग मिल्खा भाग

प्रसून जोशी यांनी केवळ या सुपरहिट चित्रपटाच्या संगीतासाठी योगदान दिले नाही तर, चित्रपटाची पटकथाही लिहिली. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याने प्रत्येकाची मने जिंकली. या चित्रपटामुळे प्रसून यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

रंग दे बसंती

आमिर खानचा ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट प्रत्येकामध्ये देशभक्ती जागृत करतो. हा चित्रपट आजही सर्वांना खूप आवडतो. या चित्रपटाच्या गाण्यांचे बोलही प्रसून जोशी यांनी लिहिले होते. या चित्रपटाचे प्रत्येक गाणे तुमच्यातील देशभक्तीच्या भावना जागृत करते. कधीकधी ते तुम्हाला भावनिक बनवते आणि कधीकधी ते तुम्हाला आनंदाने नाचण्यास देखील भाग पाडते.

गीतकार प्रसून जोशी यांना त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Sonu Sood Net Worth | ज्या सोनू सुदच्या घरी आयकरची टीम पोहोचलीय, तो वर्षाला किती कमावतो माहितीय का?

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....