AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलवर कब्जा केला आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती वाईट आहे. लोकांना देश सोडून जायचे आहे. काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. प्रत्येकजण याचा तीव्र निषेध करत आहे.

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी
जावेद अख्तर आणि शबाना आझमी
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 2:06 PM
Share

मुंबई : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलवर कब्जा केला आहे. सध्या अफगाणिस्तानची परिस्थिती वाईट आहे. लोकांना देश सोडून जायचे आहे. काबूल विमानतळावर मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत. प्रत्येकजण याचा तीव्र निषेध करत आहे. शबाना आझमी, जावेद अख्तर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना जावेद अख्तर यांनी अमेरिकेवर हल्लाबोल केला आहे.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. तालिबानच्या परिस्थितीबाबत अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानचे लोक मोठ्या संख्येने स्वतःसाठी सुरक्षित आश्रयाच्या शोधात देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर बॉलिवूडमधून सतत प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि सोशल मीडियावर सामाजिक चिंतांवर आवाज उठवणारे जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आहे. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जा केल्याबद्दल महासत्ता अमेरिका आणि पाश्चात्य देशांवर आपला राग व्यक्त केला आहे.

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानवर केले ट्विट

जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जाबद्दल आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘अमेरिका ही कसली महासत्ता आहे की, ती तालिबान नावाच्या या रानटी लोकांना संपवू शकली नाही. हे कसं जग आहे ज्याने अफगाण स्त्रियांना या मूलतत्त्ववाद्यांच्या दयेवर सोडले आहे. मानवाधिकारांचे रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या सर्व पाश्चिमात्य देशांना लाज वाटली पाहिजे.’ अशाप्रकारे, जावेद अख्तर यांचे ट्विट खूप वाचले जात आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाचे कर्मचारी हवाई दलाच्या विशेष विमानाने घरी येत असल्याची बातमी आली आहे. खरं तर, अफगाणिस्तानमध्ये हवाई क्षेत्र पुन्हा उघडल्यापासून, भारताने आपल्या नागरिकांना आणि इतर लोकांना घरी आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पाहा ट्विट

शबाना आझमी यांनीही केले ट्विट

शबाना आझमी यांनी लिहिले की, इतिहासाने आम्हाला शिकवले आहे की धर्मांधांनी धर्माच्या नावावर संस्कृतीवर प्रथम हल्ला केला. लक्षात ठेवा की तालिबान्यांनी 6व्या शतकात बामियानचे पुतळे (बामियान बुद्ध) कसे पाडले होते. हे क्रूरतेकडे निर्देश करते.

पाहा ट्विट

हेही वाचा :

बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट…

अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जानंतर सोशल मीडियावर व्यक्त झाली कंगना, म्हणाली ‘मोदीजी नसतील तर…’

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.