AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Anushka: विराटच्या नैराश्याबद्दल KRK ची शेरेबाजी; नेटकरी भडकताच डिलिट केलं ट्विट

विराट-अनुष्का या लोकप्रिय जोडीबाबत अशी शेरेबाजी केल्याने नेटकऱ्यांनी फटकारल्यानंतर काही वेळाने केआरकेनं त्याचं हे ट्विट डिलिट केलं. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

Virat Anushka: विराटच्या नैराश्याबद्दल KRK ची शेरेबाजी; नेटकरी भडकताच डिलिट केलं ट्विट
केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 28, 2022 | 2:14 PM
Share

क्रिकेटर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नैराश्याला त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कारणीभूत असल्याची टीका स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल आर खानने (KRK) केली. अनुष्कानेच विराटच्या डोक्यात ही गोष्ट आणली असेल की तो नैराश्यात आहे, कारण तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल अशी कबुली दिली, असं केआरके त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. विराट-अनुष्का या लोकप्रिय जोडीबाबत अशी शेरेबाजी केल्याने नेटकऱ्यांनी फटकारल्यानंतर काही वेळाने केआरकेनं त्याचं हे ट्विट डिलिट केलं. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

केआरकेचं ट्विट-

‘विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याला डिप्रेशनची समस्या आहे. एका हिरोईनशी लग्न करण्याचा हा परिणाम आहे. नैराश्याची बाब अनुष्कानेच विराटच्या डोक्यात आणली असावी,’ असं ट्विट केआरकेनं केलं. ‘विराट कोहलीसारख्या एका उत्तर भारतीय स्ट्राँग मुलाला डिप्रेशनसारखा आजार कसा झाला’, असं म्हणत त्याने टीम इंडियातील त्याच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या ट्विटवर सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नेटकरीसुद्धा भडकले. ‘हा मूर्खपणा आहे’, असं अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने म्हटलं.

नैराश्याविषयी विराटचा खुलासा

विराटने नुकतंच स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला. “मला हे मान्य करायला अजिबात लाज वाटत नाही की मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. हे वाटणं अगदी सामान्य गोष्ट आहे, परंतु आपण संकोच करत असल्यामुळे याबद्दल बोलत नाही. आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहोत हे तुम्हाला बघायचं नसतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, स्ट्राँग आहोत असं खोटं दाखवणं हे दुर्बल असल्याचं कबूल करण्यापेक्षा खूप वाईट आहे”, असं विराट म्हणाला होता. आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताचं प्रतिनिधित्व करत असताना विराट रविवारी त्याचा 100 वा T20I सामना खेळणार आहे.

याआधीही अनुष्का झाली ट्रोल

विराटच्या फॉर्मसाठी अनुष्काला दोष देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. विराट जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नव्हता, तेव्हा अनेकदा अनुष्काला नेटकऱ्यांनी दोषी ठरवलं होतं. 2020 मध्ये एका सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले होते, “यांनी लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टिस केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.