AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुष्पा भाऊची पुन्हा जेलमध्ये रवानगी? तेलंगणा पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या

‘पुष्पा 2’च्या प्रिमियरवेळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती, या प्रकरणात आता मोठी बामती समोर येत आहे.

पुष्पा भाऊची पुन्हा जेलमध्ये रवानगी? तेलंगणा पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या
| Updated on: Dec 17, 2024 | 9:48 PM
Share

‘पुष्पा 2’च्या प्रिमियरवेळी एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला मिळालेल्या जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तेलंगणा पोलीस आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिअटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल ‘ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिला मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला अटक केली होती. 4 डिसेंबरला चित्रपटाच्या प्रिमियरवेळी हैदराबादमध्ये असलेल्या संध्या थिअरटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन हा संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्यासोबत अचानक पोहोचला. त्यानंतर तीथे त्याच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली,गोंधळ उडाल्यानं चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.तर एक 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.

या प्रकरणात 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला पोलिसांनी अटक केलं होतं. अल्लू अर्जुनला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अल्लू अर्जुने आपल्या वकिलाच्या मदतीने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला.त्याला चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी त्याला जामीन मिळाला, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याला ती रात्र जेलमध्येच काढावी लागली, दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली.

मात्र आता समोर आलेल्या माहितीनसुार अल्लू अर्जुन याला मिळालेल्या जामिनाच्याविरोधात तेलंगणा पोलीस सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अल्लू अर्जुन याचा जमीन रद्द झाला तर पुन्हा एकदा त्याची रवानगी जेलमध्ये होऊ शकते.

दरम्यान अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी ज्या पद्धतीने अटक केलं होतं,  त्यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याने संताप व्यक्त केला. मला माझ्या बेडरूमध्ये घुसून अटक करण्यात आली, मला नाष्टा देखील करू दिला नाही, कपडेही घालू दिले नाहीत, असलं अलू अर्जुने यांने म्हटलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.