AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?

रोमान्सचा बादशाह असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज (2 नोव्हेंबर) 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला होता. शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?
Shah Rukh Khan
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 11:47 AM
Share

मुंबई : रोमान्सचा बादशाह असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज (2 नोव्हेंबर) 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला होता. शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाआधीच त्याचा आलिशान ‘मन्नत’ (Mannat) बंगला रोषणाईने सजवण्यात आला आहे.

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या घराबाहेर जमा होतात. शाहरुखही दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ‘मन्नत’च्या सर्वात उंच कोपऱ्यावर उभा राहतो. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या आलिशान ‘मन्नत’बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.

‘मन्नत’चं नाव काही औरच होतं!

शाहरुख खानने एका गुजराती व्यावसायिकाकडून आपले स्वप्नातील घर विकत घेतले आहे. या घराचे नाव पूर्वी व्हिला व्हिएन्ना होते. पण जेव्हा त्याने हे घर विकत घेतलं, तेव्हा त्यला ‘जन्नत’ हे नाव ठेवावं असं वाटलं. पण हे घर घेतल्यानंतर त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागली आणि तो करिअरच्या शिखरावर पोहोचला. त्यामुळे त्यांनी आपल्या घराचे नाव ‘जन्नत’ ऐवजी ‘मन्नत’ ठेवले.

कधीही घर विकणार नाही!

शाहरुख खानने नुकतेच सांगितले होते की, जर मी एखाद्या दिवशी संकटात सापडलो तर मी स्वतःला विकेन, पण ‘मन्नत’ कधीच विकणार नाही. शाहरुख खानचे ड्रीम हाऊस जगातील टॉप 10 घरांपैकी एक आहे.

शाहरुखने ‘मन्नत’ हे घर खरेदी केले तेव्हा त्याची किंमत 13.32 कोटी होती. मात्र, आता त्याच्या सहा मजली घराची किंमत 200 कोटींवर गेली आहे. ‘मन्नत’ हे वांद्रे बँडस्टँड, मुंबई येथे समुद्राभिमुख आहे. ‘मन्नत’ची रचना शाहरुख खानची पत्नी गौरीने केली आहे.

पुन्हा सजला ‘मन्नत’

शाहरुख खान सध्या खूप कठीण काळातून जात आहे. त्यांचा मुलगा आर्यन नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. शाहरुखचे घर प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळेसही सजले आहे. शाहरुखच्या वाढदिवसापूर्वीच त्याच्या घरी भेटवस्तू आणि फुलांची आवक सुरू झाली आहे. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानने इंडस्ट्रीत जे स्थान मिळवले आहे, काही लोक त्याची केवळ कल्पनाच करू शकतात. आज जरी शाहरुख चित्रपटांपासून ब्रेकवर असला, तरी एक काळ असा होता जेव्हा शाहरुखचा पडद्यावर मोठा दबदबा होता. हे स्टारडम आजही कमी झालेले नाही. शाहरुख हा बॉलिवूडचा असाच एक अभिनेता आहे ज्याने पडद्यावर नकारात्मक भूमिका करूनही लोकांना दाखवून दिले होते की, खलनायक गाणे गाऊ शकतो आणि जीव देखील घेऊ शकतो.

हेही वाचा :

लग्न सलमानचं, काळजी महेश मांजरेकरांना! म्हणतायत ‘तो आतून एकटा पडलाय, त्याला…’

Zee Marathi Awards 2021 : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.