Mithilesh Chaturvedi: ‘कोई मिल गया’मधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सलमान-हृतिकसह अनेक बड्या कलाकारांसह केलं होतं काम

| Updated on: Aug 04, 2022 | 11:37 AM

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये 'भाई भाई' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते 'सत्या', 'ताल', 'फिजा', 'रोड', 'कोई मिल गया', 'बंटी और बबली', 'क्रिश' आणि 'गांधी माय फादर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकले.

Mithilesh Chaturvedi: कोई मिल गयामधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सलमान-हृतिकसह अनेक बड्या कलाकारांसह केलं होतं काम
Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया'मधील अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचं निधन झालं आहे. मिथिलेश यांनी 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनौमध्ये (Lucknow) अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या (Heart Problems) होत्या. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते त्यांच्या मूळगावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील. मिथिलेश यांच्या निधनाची माहिती त्यांचे जावई आशिष यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

मिथिलेश चतुर्वेदी यांच्यासोबत ‘क्रेझी 4’ आणि ‘कोई मिल गया’ या चित्रपटांमध्ये काम केलेले दिग्दर्शक जयदीप सेन यांनी ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मिथिलेश यांना काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे ते बरे होण्यासाठी लखनौला त्यांच्या मूळगावी गेले होते. 3 ऑगस्टच्या रात्री त्यांचं निधन झालं. “मिथिलेशजींसोबत माझं खूप जवळचं नातं होतं. मला त्यांच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी 4’ मध्ये काम करण्याचं सौभाग्य मिळालं. ‘क्रेझी 4’ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. जेव्हा आपण एखाद्याला इतक्या जवळून ओळखता आणि तो व्यक्ती हे जग सोडून जातो तेव्हा खूप त्रास होतो”, अशा शब्दांत जयदीप सेन यांनी शोक व्यक्त केला.

‘कोई मिल गया’मध्ये मिथिलेश चतुर्वेदींची भूमिका

‘कोई मिल गया’ या चित्रपटात मिथिलेश चतुर्वेदी यांना कसं घेतलं, याविषयी जयदीप यांनी पुढे सांगितलं. “कोई मिल गया या चित्रपटामध्‍ये मिथिलेश चतुर्वेदींची कास्‍टिंग अतिशय रंजक पद्धतीने झाली होती. राकेश रोशन यांनी ‘फिजा’ हा चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये करिश्मा कपूर तोंडावर पाणी फेकते. ते दृश्य पाहून राकेशजींना तो अभिनेता खूप आवडला होता. या चित्रपटासाठी राकेशजींनी आणखी एक अभिनेता रवी झकड यांना बोलावलं होतं. पण करिश्मा कपूरने चित्रपटात ज्याच्या तोंडावर पाणी फेकलं तो अभिनेता कोण असा प्रश्न त्याला विचारला असता झकडजींनी सांगितलं की त्यांचं नाव मिथिलेश चतुर्वेदी आहे. मग आम्ही दोन्ही कलाकारांना ‘कोई मिल गया’ मध्ये साइन केलं”, असं ते म्हणाले

हे सुद्धा वाचा

मिथिलेश चतुर्वेदींनी 1997 मध्ये केलं पदार्पण

मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकले. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2020 मध्ये ते ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते.