AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका बंद पाडण्यात आली? दयाने सांगितलं सत्य

छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'सीआयडी'. या मालिकेनं तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला यावी, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र ही मालिका का बंद झाली, यामागचं कारण दयानंद शेट्टीने सांगितलं आहे.

अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका बंद पाडण्यात आली? दयाने सांगितलं सत्य
CID serialImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 01, 2024 | 2:55 PM
Share

मुंबई : 1 फेब्रुवारी 2024 | ‘सीआयडी’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होता. या मालिकेचा पहिला एपिसोड 1998 मध्ये प्रसारित झाला. तेव्हापासून तब्बल 1500 एपिसोड्स ऑन एअर करण्यात आले. आजही या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सीआयडी एका नव्या सिझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावा, अशी असंख्य जणांची इच्छा आहे. तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेतील दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेविषयी मोठा खुलासा केला आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.

‘सीआयडी’ या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद, अजय नागरथ, दिनेश फडणीस, तान्या अब्रॉल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. युट्यूबर लक्ष महेश्वरीला दिलेल्या मुलाखतीत दयानंदने मालिका संपण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.

याविषयी बोलताना दया म्हणाला, “आम्हाला असं वाटतं की 21 वर्षांपासून ज्या गतीने आणि ज्या क्रेझने ही मालिका सुरू होती, त्यानुसार ती बंद करायला पाहिजे नव्हती. यात काही अंतर्गत राजकारण असू शकतं किंवा मी याला नियती असं म्हणेन. तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ही मालिका बंद पाडण्यात आली.”

‘सीआयडी’ ही टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका बरीच वर्षे चालली असली तरी त्यात काही कलाकार सतत बदलत गेले. असं असूनही अवघे काही वर्षे काम केलेल्या कलाकारांनाही यशस्वी करिअर मिळालं. 2018 मध्ये मालिका बंद झाल्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा CID चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.