AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळंच संपलं.., पुरात अडकली आई, पाण्याखाली गेलं घर; अभिनेत्रीला अश्रू अनावर

आसाममधील पुराची भयाण दृश्ये सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. तिथल्या लाखो नागरिकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने एक व्हिडीओ शेअर करत तिचे कुटुंबीय पुरात अडकल्याची माहिती दिली आहे.

सगळंच संपलं.., पुरात अडकली आई, पाण्याखाली गेलं घर; अभिनेत्रीला अश्रू अनावर
देवोलिना भट्टाचार्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2026 | 2:30 PM
Share

आसाममधील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून लाखो नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहेत. विनाशकारी पुरामुळे लाखो लोकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण पुरात अडकून पडले आहेत. बॉलिवूडपासून टेलिव्हिजनपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. या पुराचा फटका ‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या कुटुंबालाही बसला आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या आई आणि कुटुंबीयांबद्दल सांगताना भावूक झाली. देवोलिनाने सांगितलं की तिची आई, मावशी आणि आजी पुरात अडकल्या असून त्यांचं घर पाण्याखाली गेलं आहे. “जर मी याआधी याबद्दल बोलले असते, तर माझ्या भावनांवर माझं नियंत्रण राहिलं नसतं. म्हणूनच मी आतापर्यंत व्हिडीओ बनवू शकले नाही. कारण मला माहीत होतं की मी रडेन”, असं देवोलिना म्हणाली.

या व्हिडीओमध्ये ती पुढे सांगते, “शिवसागर आणि नाझिरा ही ती ठिकाणं आहेत, जिथे मी लहानाची मोठी झाले. माझा जन्म तिथेच झाला आणि माझं शालेय, महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच झालं. मी आतापर्यंत व्हिडीओ न बनवण्याचं कारण हेच होतं की मला हे सर्व पाहून सहनच झालं नसतं. दुर्दैवाने माझी आई अजूनही नाझिरामध्ये अडकली आहे. पण देवाच्या कृपेने आमचं जुनं घर अशा भागात आहे, जिथे पूर्णपणे पुराचं पाणी शिरलेलं नाही. मात्र आजूबाजूच्या परिसराचं खूप मोठं नुकसान झालं आहे. माझ्या आजीचं आणि मावशीचं घर पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. सर्वकाही उद्ध्वस्त झालं आहे. काहीच शिल्लक राहिलेलं नाही.”

देवोलिनाचा व्हिडीओ-

आसाममध्ये पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली असून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागत आहे. “कष्टाने कमावलेलं सामान आणि त्यासोबतच्या आठवणी एका क्षणात पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. मी लोकांना आवाहन करते की त्यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन करते. या कठीण काळात लहान किंवा मोठी मदत एखाद्या कुटुंबाला आशेचा किरण दाखवू शकते”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. देवोलिनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30...
बालेकिल्ल्यातच भाजपला दुसऱ्या क्रमांकावर आणणारा नेता कोण? गेल्या 30 वर्षांपासून...  बिहार पोटनिवडणूकीत सर्वात मोठा उलटफेर?
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?