AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra यांच्या पहिल्या पत्नीचं दुःख, हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्यानंतर म्हणाल्या, ‘मी सुंदर नाही पण…

धर्मेंद्र यांच्यासोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्या प्रकाश कौर; पतीने दुसरं लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर...

Dharmendra यांच्या पहिल्या पत्नीचं दुःख, हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून राहिल्यानंतर म्हणाल्या, 'मी सुंदर नाही पण...
| Updated on: Apr 23, 2023 | 11:35 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा सिनेमांपेक्षा जास्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे रंगलेली असते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी विवाहित असताना देखील दुसरं लग्न केलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते धर्मेंद्र. धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित होते. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर (Who is Prakash Kaur) असं आहे. धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याबद्दल जेव्हा प्रकाश कौर यांना कळालं तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झालं. पण प्रकाश यांनी कधीही धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्याचा विचार केला नाही. शिवाय सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Boby Deol) यांना देखील कधीही वडिलांपासून विभक्त केलं नाही.

धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याचा विचार केला, तेव्हा धर्मेंद्र यांचं आनंदी कुटुंब होतं. पतीने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश कौर यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण प्रकाश यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला नाही. प्रकाश यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हेमा मालिनी यांच्या सवत म्हणून व्यतीत केलं.

धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केल्यानंतर प्रकाश कौर यांनी एक मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, ‘मी उच्च शिक्षित नाही, मी सुंदर देखील नाही. पण माझ्या मुलांसाठी मी जगात सर्वश्रेष्ठ महिला आहे आणि माझ्यासाठी माझी मुलं सर्वकाही आहे. मी माझ्या मुलांना खूप चांगल्याप्रकारे ओळखते आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे की, ते कधीही कोणालाही त्रास देवू शकत नाहीत…’ असं प्रकाश कौर म्हणाल्या.

प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचं लग्न १९५४ साली झालं होतं. त्यावेळी प्रकाश कौर फक्त आणि फक्त १९ वर्षांच्या होत्या. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. त्यांच्या दोन मुलांची नावे सनी देओल आणि बॉबी देओल असून मुलीचं नावे अजीता देओल आणि विजेता देओल आहे. प्रकाश आणि धर्मेंद्र यांची दोन मुले प्रसिद्ध अभिनेते आहेत.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी

‘तुम हसीन मैं जवान’ सिनेमाच्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये प्रेम बहरलं. जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९८० साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर आजपर्यंत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या मुख्य घरी गेलेल्या नाहीत. दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासाठी नवं घर खरेदी केलं. धर्मेंद्र आणि हेमा यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मुलींची नावे ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. हेमा मालिनी आणि प्रकाश कौर कधीही एकमेकांच्या समोर आल्यानंतर, पण दोघी एकमेकींचा आदर करतात.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.