AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेठालाल-बबिताने खरंच सोडली ‘तारक मेहता..’ मालिका? निर्मात्यांनी सोडलं मौन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून जेठालाल आणि बबिताजी गायब आहेत. या दोघांनी मालिका सोडली की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यावर आता मालिकेच्या निर्मात्यांनी मौन सोडलं आहे.

जेठालाल-बबिताने खरंच सोडली 'तारक मेहता..' मालिका? निर्मात्यांनी सोडलं मौन
दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, असितकुमार मोदीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2025 | 11:36 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं गेल्या 16-17 वर्षांपासून या मालिकेत काम करत असून लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. जेठालाल आणि बबिताजी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांमुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. अखेर या चर्चांवर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत हॉरर कथेचा ट्रॅक सुरू होता. या आगळ्या वेगळ्या ट्रॅकचा फायदा मालिकेच्या टीआरपीलाही झाला. ‘अनुपमा’ला मागे टाकत ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आली. परंतु या संपूर्ण ट्रॅकदरम्यान मालिकेतून जेठालाल आणि बबिता यांच्या भूमिका गायब होत्या. मालिकेतील ट्रॅकनुसार जेठालाल बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि बबिता तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे. त्यामुळे दिलीप जोशी आणि मुनमुन यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे या चर्चांना निर्माते असित कुमार मोदी यांनी चुकीचं म्हटलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असित कुमार मोदी म्हणाले, “असं काहीच नाही. सर्वजण आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांची काही वैयक्तिक कारणं होती, ज्यामुळे ते मालिकेच्या शूटिंगला उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु त्यांनी मालिकाच सोडल्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. आजकाल सोशल मीडिया खूप नकारात्मक झाला आहे. परंतु तुम्हाला तुमचे विचार सकारात्मक ठेवावे लागतील. आमची ही मालिकासुद्धा सकारात्मक विचारांची आहे. हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. या मालिकेचे एपिसोड्स पाहून लोक त्यांचं टेन्शन विसरतात. त्यामुळे किमान या शोबद्दल तरी काही नकारात्मक बातम्या पसरवू नका. छोट्या-छोट्या गोष्टींमधून अफवा पसरवणं बरं नाही.”

याआधी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहनेही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मला असं वाटत नाही की ते मालिका सोडून जातील. या सर्व अफवा असू शकतात”, असं तो म्हणाला होता. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून अनेक कलाकारांची एक्झिट झाली. यात दयाबेन, तारक मेहता, रोशन सोढी, गोली यांच्या भूमिका साकारलेल्या कलाकारांचा समावेश आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.