आलियाच्या बहिणींना रणबीरने ‘जूता चुराई’साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत घरातच लग्न केलं होतं. यावेळी 'जूता चुराई'नंतर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, असं म्हटलं जात होतं. त्यावर खुद्द रणबीरने उत्तर दिलं आहे.

आलियाच्या बहिणींना रणबीरने 'जूता चुराई'साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा
Alia Bhatt and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 9:59 AM

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा त्याचा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ स्ट्रीम होत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूरने त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीसोबत हजेरी लावली. यावेळी सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने सर्वांना खळखळून हसवलं. या एपिसोडमध्ये रणबीर, नीतू आणि रिद्धिमा यांनी त्यांच्या कुटुंबीयांविषयीच्या बऱ्याच गोष्टी मोकळेपणे सांगितल्या. रणबीरला यावेळी त्याच्या लग्नाविषयीचा एक किस्सासुद्धा विचारला गेला. त्याने आलिया भट्टच्या बहिणींना ‘जुता चुराई’नंतर किती रुपये दिले होते, असा प्रश्न कपिलने विचारला होता.

रणबीरने मोजके कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्याच्या घरी आलिया भट्टशी लग्न केलं होतं. त्यावेळी लग्नादरम्यान अशी चर्चा होती की रणबीरने आलियाच्या बहिणींना चप्पल लपवण्याच्या विधीसाठी 11 कोटी रुपये दिले होते. आता कपिल शर्माने रणबीरने याविषयी प्रश्न विचारला. “तू खरंच आलियाच्या बहिणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का”, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना रणबीर म्हणतो, “नाही, हे खरं नाही.” नंतर नीतू कपूर सांगतात की रणबीरने त्यांना काही रोख रक्कम दिली होती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

रणबीर पुढे म्हणतो, “आलियाच्या बहिणींनी माझ्याकडून काही लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते कमी करून मी त्यांना काही हजार रुपयांपर्यंतची कॅश दिली होती.” हे ऐकताच परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुरण सिंह थक्क होते. “हजारांमध्ये? इतकं कमी?”, असं ती रणबीरला विचारते. तेव्हा रणबीर सांगतो, “हो, आमचं लग्न घरीच झालं होतं. त्यामुळे चप्पल लपवली असती तरी ती घरातच असती.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

यावेळी कपिलसुद्धा त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो. “माझ्या मेहुणींनी लपवलेली चप्पल परत देण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही चप्पल आणि तुमची बहीणसुद्धा तुमच्याकडेच ठेवा. मला माहित होतं की गिन्नी माझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे ती स्वत:हून माझ्याकडे आली असती. राहता राहिली गोष्ट चपलांची, तर ते मी नवीन विकत घेतले असते”, असं कपिल म्हणतो.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.