AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलियाच्या बहिणींना रणबीरने ‘जूता चुराई’साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत घरातच लग्न केलं होतं. यावेळी 'जूता चुराई'नंतर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, असं म्हटलं जात होतं. त्यावर खुद्द रणबीरने उत्तर दिलं आहे.

आलियाच्या बहिणींना रणबीरने 'जूता चुराई'साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा
Alia Bhatt and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 9:59 AM
Share

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा त्याचा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ स्ट्रीम होत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूरने त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीसोबत हजेरी लावली. यावेळी सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने सर्वांना खळखळून हसवलं. या एपिसोडमध्ये रणबीर, नीतू आणि रिद्धिमा यांनी त्यांच्या कुटुंबीयांविषयीच्या बऱ्याच गोष्टी मोकळेपणे सांगितल्या. रणबीरला यावेळी त्याच्या लग्नाविषयीचा एक किस्सासुद्धा विचारला गेला. त्याने आलिया भट्टच्या बहिणींना ‘जुता चुराई’नंतर किती रुपये दिले होते, असा प्रश्न कपिलने विचारला होता.

रणबीरने मोजके कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्याच्या घरी आलिया भट्टशी लग्न केलं होतं. त्यावेळी लग्नादरम्यान अशी चर्चा होती की रणबीरने आलियाच्या बहिणींना चप्पल लपवण्याच्या विधीसाठी 11 कोटी रुपये दिले होते. आता कपिल शर्माने रणबीरने याविषयी प्रश्न विचारला. “तू खरंच आलियाच्या बहिणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का”, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना रणबीर म्हणतो, “नाही, हे खरं नाही.” नंतर नीतू कपूर सांगतात की रणबीरने त्यांना काही रोख रक्कम दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

रणबीर पुढे म्हणतो, “आलियाच्या बहिणींनी माझ्याकडून काही लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते कमी करून मी त्यांना काही हजार रुपयांपर्यंतची कॅश दिली होती.” हे ऐकताच परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुरण सिंह थक्क होते. “हजारांमध्ये? इतकं कमी?”, असं ती रणबीरला विचारते. तेव्हा रणबीर सांगतो, “हो, आमचं लग्न घरीच झालं होतं. त्यामुळे चप्पल लपवली असती तरी ती घरातच असती.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

यावेळी कपिलसुद्धा त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो. “माझ्या मेहुणींनी लपवलेली चप्पल परत देण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही चप्पल आणि तुमची बहीणसुद्धा तुमच्याकडेच ठेवा. मला माहित होतं की गिन्नी माझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे ती स्वत:हून माझ्याकडे आली असती. राहता राहिली गोष्ट चपलांची, तर ते मी नवीन विकत घेतले असते”, असं कपिल म्हणतो.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.