AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलियाच्या बहिणींना रणबीरने ‘जूता चुराई’साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत घरातच लग्न केलं होतं. यावेळी 'जूता चुराई'नंतर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, असं म्हटलं जात होतं. त्यावर खुद्द रणबीरने उत्तर दिलं आहे.

आलियाच्या बहिणींना रणबीरने 'जूता चुराई'साठी दिले होते 11 कोटी रुपये? कपिल शर्माच्या शोवर खुलासा
Alia Bhatt and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 9:59 AM
Share

लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा त्याचा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ स्ट्रीम होत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूरने त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीसोबत हजेरी लावली. यावेळी सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि अभिनयाने सर्वांना खळखळून हसवलं. या एपिसोडमध्ये रणबीर, नीतू आणि रिद्धिमा यांनी त्यांच्या कुटुंबीयांविषयीच्या बऱ्याच गोष्टी मोकळेपणे सांगितल्या. रणबीरला यावेळी त्याच्या लग्नाविषयीचा एक किस्सासुद्धा विचारला गेला. त्याने आलिया भट्टच्या बहिणींना ‘जुता चुराई’नंतर किती रुपये दिले होते, असा प्रश्न कपिलने विचारला होता.

रणबीरने मोजके कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्याच्या घरी आलिया भट्टशी लग्न केलं होतं. त्यावेळी लग्नादरम्यान अशी चर्चा होती की रणबीरने आलियाच्या बहिणींना चप्पल लपवण्याच्या विधीसाठी 11 कोटी रुपये दिले होते. आता कपिल शर्माने रणबीरने याविषयी प्रश्न विचारला. “तू खरंच आलियाच्या बहिणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का”, असं तो विचारतो. त्यावर उत्तर देताना रणबीर म्हणतो, “नाही, हे खरं नाही.” नंतर नीतू कपूर सांगतात की रणबीरने त्यांना काही रोख रक्कम दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

रणबीर पुढे म्हणतो, “आलियाच्या बहिणींनी माझ्याकडून काही लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते कमी करून मी त्यांना काही हजार रुपयांपर्यंतची कॅश दिली होती.” हे ऐकताच परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली अर्चना पुरण सिंह थक्क होते. “हजारांमध्ये? इतकं कमी?”, असं ती रणबीरला विचारते. तेव्हा रणबीर सांगतो, “हो, आमचं लग्न घरीच झालं होतं. त्यामुळे चप्पल लपवली असती तरी ती घरातच असती.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

यावेळी कपिलसुद्धा त्याच्या लग्नातील किस्सा सांगतो. “माझ्या मेहुणींनी लपवलेली चप्पल परत देण्यासाठी 11 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही चप्पल आणि तुमची बहीणसुद्धा तुमच्याकडेच ठेवा. मला माहित होतं की गिन्नी माझ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे ती स्वत:हून माझ्याकडे आली असती. राहता राहिली गोष्ट चपलांची, तर ते मी नवीन विकत घेतले असते”, असं कपिल म्हणतो.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट