AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायाच्या 50 व्या वर्षी गायकाने 16 वर्ष लहान महिलेसोबत थाटला दुसरा संसार, लैंगिक शोषणाचे त्याच्यावर आरोप

लैंगिक शोषणाचे आरोप अललेल्या गायकाने 50 व्या वर्षी थाटला दुसरा संसार, 16 वर्ष लहान आहे दुसरी बायको... दोघांचे फोटो सर्वत्र व्हायरल..., सध्या गायकाच्या खासगी आयुष्याची रंगतीये सर्वत्र चर्चा...

वायाच्या 50 व्या वर्षी गायकाने 16 वर्ष लहान महिलेसोबत थाटला दुसरा संसार, लैंगिक शोषणाचे त्याच्यावर आरोप
फाईल फोटो
| Updated on: Oct 26, 2025 | 11:50 AM
Share

झगमगत्या विश्वात एक गोष्ट कायम चर्चेत असते आणि ती म्हणजे, सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य… ब्रेकअप, लग्न, घटस्फोट, याबद्दल सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. गायकाने वयाच्या 50 व्या वर्षी स्वतःपेक्षा 16 वर्ष लहान महिलेसोबत लग्न केलं आहे. ज्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे देखील आरोप लागले आहेत. आता त्याच गायकाने 16 वर्ष लहान महिलेसोबत दुसरा संसार थाटला आहे.

सध्या ज्या गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे, त्या गायकाचं नाव रघू दीक्षित असं आहे. एक काळ असा होता जेव्हा गायक वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘टू स्टेट’ सिनेमातील ‘मस्त मगन’ गाणं गाणारी गायिका चिन्मयी श्रीपदा हिने रघू दीक्षित याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते…

चिन्मयी हिच्या आरोपांनंतर रघू दीक्षित याची पहिली पत्नी मयुरी उपाध्याय हिच्यासोबत घटस्फोट झाला. 2019 पासून दोघे विभक्त राहत होते. आता गायकाने 34 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत दुसरा संसार थाटला आहे. रघू दीक्षितचं लग्न गायिका वरिजाश्री वेणुगोपालशी झालं आहं. रघू 50 वर्षांचा आहे, तर वरिजाश्री त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. वरिजाश्री एक गायिका आणि संगीत शिक्षिका आहे. रघू आणि वरिजाश्री यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचा एक फोटो आहे. दोघेही एका झोक्यावर बसून हसत आहेत. पोस्टमध्ये तिने लिहिलं की, “आपल्या वडीलधाऱ्या, कुटुंबियांच्या आणि प्रियजनांच्या आनंद आणि पाठिंब्याच्या आशीर्वादाने या नवीन प्रवासाला सुरुवात करताना आनंद होत आहे.” सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, रघू दीक्षित आणि वरिजाश्री यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल काहीही कळलेलं नाही. पण रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, दोघांचं लग्न 14 ऑक्टोबर रोजी झालं आहे. रघु-वरिजाश्रीच्या लग्नाला अभिनेत्री यमुना श्रीनिधीसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

रघू दीक्षित याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं ढालं तर, त्याने 2005 मध्ये कोरिओग्राफर मयुरी उपाध्याय हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये रघू आणि मयुरी यांचा घटस्फोट झाला. 2016 पासूनच दोघांनी विभक्त राहण्यास सुरुवात केलेली. याचदरम्यान, गायिका श्रीपदा हिने रघू याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. तेव्हा मयुरी हिने देखील पूर्व पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

रघू दीक्षितवर लैंगिक छळाचा आरोप

रघु दीक्षितवर गंभीर आरोप झालेले, ज्यासाठी त्याने माफी देखली मागितली होती, गायिका चिन्मयी श्रीपादाने ट्विटरवर अज्ञात महिलांचे आरोप शेअर केले, ज्यात दीक्षितवर स्टुडिओमध्ये लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलेला. एका महिलेने आरोप केल्यानुसार, रेकॉर्डिंगनंतर, दीक्षितने तिला स्वतःकडे ओढलं आणि चेकवर सही करताना तिला किस करण्यास सांगितलं, त्यानंतर ती रडत पळून गेली.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत