AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. जर घरातील एखाद्या वस्तुची दिशा चुकली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते अशी मान्यता आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
balconyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 8:58 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या सोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर तो केवळ तुमच्या नशीबाचा दोष नसतो, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. अनेकदा आपण दररोज अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे आपण संकटात सापडू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो, त्यामुळे घराची सजावट करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

बाल्कनीची सजावट करताना काय काळजी घ्यावी?

वास्तुशास्त्रामध्ये जसं तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम याचं महत्त्व असतं, तेवढंच तुमच्या घराच्या बाल्कनीचं देखील महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा नवीन घर घेता तेव्हा बाल्कनीची दिशा कोणती आहे, ते पाहूनच घर घ्यावं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची बाल्कनी ही शक्यतो पूर्व दिशेलाच असावी. जर पूर्व दिशेला नसेल तर पश्चिम दिशेला असली तरी चालेल पण घराची बाल्कनी ही कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बाल्कनीची सजावट करताना तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असे काही झाडं ठेवू शकतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जसं की तुळस, शमी या सारखी झाडं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकतात. तसेच फुलांची झाडं देखील लावू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी शक्यतो बाल्कनीत काटेरी झाडं लावणं टाळावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही बाल्कनीमध्ये काटेरी झाडं लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वादव विवाद होतात, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....