AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष

वास्तुशास्त्रामध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. जर घरातील एखाद्या वस्तुची दिशा चुकली तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते अशी मान्यता आहे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
balconyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 8:58 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या सोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर तो केवळ तुमच्या नशीबाचा दोष नसतो, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. अनेकदा आपण दररोज अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे आपण संकटात सापडू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो, त्यामुळे घराची सजावट करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

बाल्कनीची सजावट करताना काय काळजी घ्यावी?

वास्तुशास्त्रामध्ये जसं तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम याचं महत्त्व असतं, तेवढंच तुमच्या घराच्या बाल्कनीचं देखील महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा नवीन घर घेता तेव्हा बाल्कनीची दिशा कोणती आहे, ते पाहूनच घर घ्यावं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची बाल्कनी ही शक्यतो पूर्व दिशेलाच असावी. जर पूर्व दिशेला नसेल तर पश्चिम दिशेला असली तरी चालेल पण घराची बाल्कनी ही कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बाल्कनीची सजावट करताना तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असे काही झाडं ठेवू शकतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जसं की तुळस, शमी या सारखी झाडं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकतात. तसेच फुलांची झाडं देखील लावू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी शक्यतो बाल्कनीत काटेरी झाडं लावणं टाळावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही बाल्कनीमध्ये काटेरी झाडं लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वादव विवाद होतात, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?