AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा तिसरी व्यक्ती नात्यात येते..; गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीताने सगळंच सांगितलं

'लॉक अप'च्या नव्या सिझनमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये सुनीताने गोविंदासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.

जेव्हा तिसरी व्यक्ती नात्यात येते..; गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीताने सगळंच सांगितलं
Govinda and Sunita AhujaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2026 | 11:17 AM
Share

‘लॉक अप’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. यंदाच्या सिझनमध्ये एकापेक्षा एक दमदार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाचाही समावेश होता. शोच्या प्रीमिअरमध्येच सुनीताने पुन्हा एकदा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रसंचालक फराह खान आणि रितेश देशमुख यांच्याशी बोलताना सुनीताने तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित जुन्या अफवांवर मोकळेपणे भाष्य केलं. त्याचसोबत तिने पती गोविंदाच्या कथित अफेअर्सबद्दलही थक्क करणारे दावे केले आहेत.

गोविंदाबद्दल सुनीता म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा तुम्हाला सर्वकाही सहन करावं लागतं. चीचीच्या (गोविंदा) आयुष्यात किती अफेअर्स होते? अभिनेते आणि अभिनेत्रींचे अफेअर्स असतात, ठीक आहे. मला असं वाटतं की, इतक्या वर्षांपर्यंत चीचीची साथ दिल्यानंतर पुढच्या जन्मी त्याची मुलगी बनण्याचा मला हक्क आहे (हसते). जोपर्यंत पती आणि पत्नी एकत्र असतात, तोपर्यंत सर्वकाही ठीक असतं. पण जेव्हा त्यात तिसरी व्यक्ती येते, तेव्हा परिस्थिती बिघडते. मी कधीच खोटं बोलले नाही, हे पहा.. मी नेहमीच खरंच बोलते.”

‘लॉक अप 2’मध्ये सुनीता अहुजासोबतच राम कपूर, शिवांगी जोशी, आकांक्षा चमोला, योगेश रावत, रियाझ अली, धीरज धूपर, श्रेया कालरा, सुफी मोतीवाला आणि इतरही अनेकजण सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे लग्नाच्या 38 वर्षांनंतर विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आम्ही दोघं वेगवेगळे राहतोय, अशी कबुली खुद्द सुनिताने दिली होती. इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली होती. परंतु नंतर दोघांनी या नात्याला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण गोविंदाचं विवाहबाह्य संबंध असल्याचंही म्हटलं गेलं होतं.

बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना गोविंदाची भेट सुनिता अहुजाशी झाली होती. त्यावेळी सुनिता नववीत शिकत होती. सुनिता तेव्हा तिच्या बहिणीच्या घरी राहत होती आणि सुनिताच्या बहिणीने गोविंदाच्या मामाशी लग्न केलं होतं. गोविंदा आणि सुनिताच्या नात्याची सुरुवात फार काही सकारात्मक नव्हती, परंतु हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार बनण्याआधीच गोविंदाने सुनिताशी लग्न केलं होतं. 1986 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर चार वर्षांपर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याला सर्वांपासून लपवून ठेवलं होतं.

Follow Us
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन