AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, मोठी माहिती अखेर समोर

Salman Khan | सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार, गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, मुंबई पोलीस गुजरातमध्ये दाखल... धक्कादायक घटनेप्रकरणी मोठी माहिती समोर... 14 एप्रिल रोजी पहाटे सलमान खान याच्या घराबाहेर दोन आरोपींनी गोळीबार केला होता... याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत...

सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, मोठी माहिती अखेर समोर
| Updated on: Apr 22, 2024 | 11:19 AM
Share

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं प्रकरण सध्या तुफान चर्चेत आहे. याप्रकणी पुढील चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये दाखल झाली आहे.ओरोपींनी गुन्हात वापरलेल्या पिस्तुलचा शोध घेण्यासाठी पोलीस गुजरात येथे पोहोचले आहेत.

आरोपींनी गुन्हात वापरलेली पिस्तुल गुजरात येथे फेकल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी तापी नदीमध्ये पिस्तुल फेकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तापी नदी येथे पिस्तुलचा शोध सुरु असल्याची समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेचे युनिट -9 चे प्रमुख दया नायक सध्या गुजरातमध्ये दाखल झाले आहे.

गोळीबारा प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरु केली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपीांनी गुजरातच्या दिशेने पलायन केलं. तेव्हा प्रवासात तापी नदीमध्ये आरोपींनी पिस्तुल फेकल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस देखील गुजरात येथे दाखल झाले आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याठिकाणी स्थानिक पोलीस देखील उपस्थित आहेत.

आरोपीने पोलिसांना बंदूक सुरतच्या तापी नदीत फेकल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे पोलिसांचे पथक सुरतमध्ये शोध घेत आहेत. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक सुरतच्या नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले… आता या प्रकरणी पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गोळीबारानंतर आरोपींनी कसं केलं पलायन?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर, आरोपी वांद्रे येथील माउंट मेरी चर्च बाहेर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी बाईक सोडली आणि वांद्रे स्टेशनसाठी रिक्षा केली. त्यानंतर बोरिवली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे पोहोचले. पण सांताक्रुज स्टेशनवर उतरले आणि पुढे गेले. या जागांवर असलेल्या सीटीटीव्ही फुटेजमुळे दोघांबद्दल माहिती समोर आली आहे…या घटनेच्या तपासासाठी अधिक पथके तयार करण्यात आली आहेत.

सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्याला अनेकदा ईमेलमधून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. यामुळे आता झालेल्या गोळीबारानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.